マ守。 गांव-गाडा. राहिला वेळ हातपाय जोडून बसत आलों. ठोंब्या ब्राह्मणाला कोळ्याप्रमाणें टोणग्यावर पखाली वाहून पैसे मिळवितां येईनात किंवा चलाख महाराला लेखणी चालवून डोकें काढतां येईना. ह्याप्रमाणें कोणालाच आपापल्या मगदुराप्रमाणें परजातीचा धंदा करतां येईना. धंदा करणारांच्या बायकांना सुद्धां धंद्याचें काम पडू लागलें म्हणजे त्या धंद्यांतलें काम वाढलें असें म्हणतां येईल. ह्या मापानें मोजू गेलें तर महाराष्ट्रांत तरी तशी स्थिति बरीच शतकें नसावी. ' सगळी बायको ळियाची, अर्थी बायको माळ्याची आणि ऋणकरी बायको ब्राह्मणाची’ ही म्हण फार जुनी आहे; आणि ती असें सांगते की, विणकाम वबागाईत शेती ह्या दोन धंद्यांतील लोकांपेक्षां इतरांना भरपूर काम पडत नव्हतें. श्रेमविभाग झाला पाहिजे; पण तो तोंडाकडील भाग पवित्र व शेंपष्टकडील अपवित्र, म्हणून वरिष्ट जातीनें तोंडांकडून व कानिट जातीनें शेपटाकडून निमानिम करावा असला नसावा. आमच्यांतील पुष्कळ हात होण्यासारखीं कामें जातथंद्यांनीं विभागून दिल्यामुळे किस तिंगा झाला आहे. सबंध सनंग एक हातीं किंवा एकतंत्रीं म्हणजे एकायाळूच्या (दर्दी) नजरेखालीं तयार झालें तर त्याचे सर्व भाग प्रमाणशैीर करून तें सर्वांग बळकट व उपयुक्त बनविण्याकडे कारखानदाराला लक्ष्य देतां येर्त. जातधर्मानें ही घड़ी मोडली, आणि जाती व पोट जाती परस्परावलंबी धंद्यांत गैरवाकब राहून त्यांची एकहाती दोरीसुटली. परदेशगमनाला अटकाव करून पुढें प्रांताम्रांतांचें दळणवळण जातिभेदानें संपुष्टांत आणिलें सिद्ध-निषिद्धता व स्थानेक ह्यांच्या चरकांत कसब सांपडून अनुकूलता असतांनाही एक जात दुसरीचा धंदा करीनाशी झाली, इतकेंच नव्हे तर अरूढ पद्धतीनें । तो करणाराला वाळींत टाकण्यापर्यंत जातगंगा छळूलागली. अशा रीतीनें आमच्यांत व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिवैचित्र्य,चढाओढ ही पार जिरून गेली, व संघटनाशात लुप्तप्राय झाली; आणि जी देश एका काली सर्व प्रकार च्या ज्ञानांत, कलांत व सुधारणांत अॅग्रगण्य होता, त्याचें वैभव इत
पान:अशोक.pdf/255
Appearance