पान:अशोक.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डुकानदारी. १५३ यात्रांत विकावयाला काढीन तर सोय नसते. कां नसते ह्याचीं कारणें मार्गे आली आहेत. आठवडाबाजारांपेक्षां यात्रांत चोरटे, भामटे पुष्कळ जास्त येतात; आणि त्यांत बायकापोरांची गर्दी अधिक असल्यामुळे त्यांच्या हातचलाखीस वाव अधिक सांपडतो. उचलेगिरीतलें प्राथमिक शिक्षण मिळण्याला आडवळणी गांवांतल्या यात्रेसारखी शाळा कश्चितच आढळेल. पुष्कळ यात्रांतून अनेक त-हेचा जुगारही चालू असतो. ख-याखोट्या भिका-यांची सर्व यात्रांत झिंबड असते, आणि त्यांचा उपसर्ग दुकानदारांना व गि-हाइकांना फार लागतो. ते उघडपणें याचना व त्रागा आणि लपून छपून चो-या करतात. लोक जिकडे तिकडे पांगलेले व बावरलेले असल्यामुळे चोरीचा पत्ता बहुधा लागत नाहीं. व्याधिग्रस्त, मुरळ्या, कोल्हाटणी, हरदासिष्णी यात्रांतून रोग व आचरटपणा यांचा प्रसार करतात. नाच, तमाशे चालू असल्यामुळे स्थानिक आधिका-यांना यात्रांतील अनिष्ट प्रकारांकडे लक्ष देण्यास फुरसत मिळत नाहीं ! गांव-कामगार व हलक्या दर्जाचे पोलीस ह्यांना यात्रा म्हणजे केवळ हकाच्या करमपुकोचीं स्थाने होत, असें म्हटलें असतां अतिशयोक्ति होणार नाहीं ! देवदर्शन, नवस फेडणें, करमणूक, आपापसांतल्या भेटी वगैरे कामांमुळे यात्रेकरूंची धांदलपट्टी चालते, आणि बहुतेक बोलून चालून मजेखातर आलेले असतात. वरील कारणांस्तव खेड्यांतले लोक यात्रांमधील सौद्यांत आतशष्यू ट्रॅक्तात, व त्यांच्या चोप्याही पुष्कळ होतात. गांवोगांव आणि त्यांतही एकाच मित्तीला अनेक गांवीं यात्रा असल्यामुळे यात्रांचा नीट बंदोबस्त करण्यास पोलीसला अडचण पडते, व देखरेखीसाठीं पुरेसे अंमलदार पाठवितां येत नाहीं. वर वर्णन केलेल्या अनिष्ट प्रकारांसाठीं यात्रा जितक्या कमी होतील, तितकें बरें असें वाटतें. फार तर तालुक्याप्रत एकाद्या मध्यवर्ती मोठ्या गांवीं यात्रा भरवावी, आणि तेथें दुकानदार, मल्ल व खेळ्ये जमावेत; म्हणजे विक्रीच्या मालावर भरपूर देखरेख राहील, दुकानदारांच्या लबाडीला आळा पडेल, स्वतंत्र यात्रा भरविण्याचा गांवचा खर्चवांचेल, आणि चढ़ाओढोनें गुणाची