पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खूप ताप होता. हिनं रिक्शा करून आईला डॉक्टरकडे नेलं. त्यांच्या मनात जायचं नव्हतं पण ती म्हणाली, "खर्चाची तू काळजी करू नकोस मी देईन." डॉक्टरने सांगितलेली औषधं तिन लगेच आणून दिली.
  घरी आल्यावर ती म्हणाली, "अरुण गेला तेव्हा त्याला माहीत होतं ना तू आजारी आहेस म्हणून? मग हा पसारा आवरला असता तर काय इस्तरी बिघडली असती का त्याची?"
 "त्यानं आवरायची काय गरज होती?"
 "मग कोण करणार हे सगळं?"
 "मी केलं असतं उठत-बसत. तू उगीच जास्त बोलू नको. तुझा काय संबंध आहे?"
 पण मग उषाने केर काढला, पाणी भरून आणलं, भांडी घासली. भाकरी केली ते त्यांनी मुकाट्याने तिला करू दिलं. त्यांचा आजार बरेच दिवस चालला आणि उषाने येऊन घरकाम करून जायचं हे नित्याचंच झालं. ती जायची तेव्हा अरुण बहुतेक घरी नसे. क्वचित असला तरी तिला मदत करीत नसे. ती स्वैपाक करून जायची. पण आज तूही जेव हो इथे असं एकदाही मायलेकांच्या तोंडून बाहेर पडलं नाही. कदाचित पडत्या फळाची आज्ञा मानून ती रोजच त्यांच्याकडे जेवायला लागेल, मग रहायला सुद्धा येईल अशी त्यांना भीती वाटली असेल.
 हळूहळू सावित्रीबाईंच्या तब्बेतीला उतार पडला. त्या थोडं हिंडायफिरायला, चार घास खायला लागल्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं आता काही पथ्य नाही, त्यांना आवडेल ते खायला द्या. त्यांना चिक्कू फार आवडायचे म्हणून ते आणायला उषा मंडईत गेली. तिथे तिला गायकवाडीणबाई भेटल्या. तिची आई बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे काम करायची.
 त्यांनी विचारलं, "अग उषा, तुझ्या आईचा काय पत्ता आहे? बरेच दिवस झाले कामाला येत नाही."
 "आजारी होती, बाई."
 एकदा निरोप आला होता पण त्यालाही आत पुष्कळ दिवस झाले."

 "फार आजारी होती. आत्ताच कुठे उठलीय. हे काय तिच्यासाठीच थोडे चिक्कू घ्यायला आले होते."

॥अर्धुक॥
॥७॥