या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अच्युत गोडबोले
(सुप्रसिद्ध लेखक, अर्थतज्ज्ञ)
प्रस्तावना
डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी लिहिलेलं
'अर्थाच्या अवती-भवती' हे पुस्तक खूप
महत्त्वाचंं आहे. जागतिकीकरणाचा सर्वत्र
जयजयकार चालू असताना त्याविषयी
परखडपणेे विचार मांडून आपल्याला सखोल
विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे.
जागतिकीकरणाचा शेती, स्त्रिया, रोजगार,
उद्योग अशा अनेक क्षेत्रांवर काय परिणाम
झाला, याविषयीचे विचार लेखिकेने अतिशय
उत्तम तऱ्हेने मांडलेले आहेत. ते मांडताना
त्यांनी अनेक उदाहरणं, अनेक पुस्तकांचे
आणि लेखांचे संदर्भही दिलेले आहेत.
देशातील गरीबातील गरीब व्यक्तीच्या जीवनात
होणारा बदल आणि त्याच्याशी निगडित
धोरणांच्या आधारे भारतातील आर्थिक स्थिती
लक्षात घ्यावी लागेल, याचा पुस्तकात स्पष्ट
उल्लेख करण्यात आला आहे. असे
अभ्यासपूर्ण पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि
अभ्यासकांनी वाचलंच पाहिजे.
डॉ.मृणालिनी फडणवीस यांना आणि
या पुस्तकाच्या प्रकाशकांना माझ्या शुभेच्छा!
अर्थाच्या अवती-भवती | ५