पान:अभिवादन (Abhivadan).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


११२ । अभिवादन



चनानंतरचे निष्कर्ष परस्परांपेक्षा भिन्न असणार आणि अपवाद म्हणून एखाददुसरे एकसारखे येणार हे उघड आहे. तरी पण त्यांच्या विवेचनाचे सांस्कृतिक अध्ययनातले महत्त्व मला जाणवते हे मी नाकारणार नाही.
 महाभारताविषयी अनंतरावांचे लिखाण प्रामुख्याने इतरांच्या विवेचनातील श्रुटी आणि चुका दाखवण्यात गुरफटले आहे. यापुढे जाऊन त्यांनी काही स्वतंत्रपणे लिहावे अशी अपेक्षा आहे. तसा त्यांचा अभ्यासही आहे. युधिष्ठिरासारखा मुत्सद्देगिरी नसलेला, फार मोठे युद्धकौशल्य नसलेला द्युताच्या आहारी जाऊन आपले व आपल्या बाजूचे नुकसान करून घेणारा माणूस पांडवांनी आपला नेता म्हणून मान्य केला. भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा तोच राजा असावा अशी खटपट केली. ही घटना एकदा आपण विधायक पद्धतीने समाजावून सांगितली पाहिजे. पुरुष जर आधी जन्मलेला असेल तर हिणकस लायकीचा असला तरी तो नेता मानावा ह्याचे समर्थन तरी आपण केले पाहिजे किंवा धर्मराज सत्प्रवृत्त आणि सज्जन होता ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की, त्याचे उरलेले सर्व दोष क्षम्य मानले पाहिजेत. किंवा राजा होण्यासाठी राजकारणात, लढण्यात रस नाही, भजनपूजनात मात्र खूप रस आहे आणि माणूस कोणाच्या अध्यातमध्यात न पडणारा सज्जन आहे, एवढी लायकी पर्याप्त मानली पाहिजे, या भूमिकेचे तरी आपण समर्थन केले पाहिजे. अजूनही पर्याय पुष्कळ आहेत. युधिष्ठिराचे गतजन्मीचे पुण्यच मोठे होते, म्हणून त्याला या जन्मी राजयोग होता, हा एक पर्याय आहे. भगवंताची लीला अगाध आहे, आपण त्याची चर्चा करणारे कोण, हा आणखी एक पर्याय आहे.
 आपण समजतो तसा युधिष्ठिर भोळाभाबडाही नाही किंवा तो पराक्रमात हिणकसही नाही. तो चतुर, मुत्सद्दी, कुशल संघटक, पुरेसा चाणाक्ष आणि सावध आहे. याशिवाय तो सत्प्रवृत्त आहे. महात्मेपण आणि मुत्सद्देगिरी या दोन्ही बाबी विसंगत असतातच असे नाही. काही जणांच्या ठिकाणी त्या सुसंगत होतात. म्हणूनच जीवनात दुर्जनाच्या सर्व लबाड्यांवर मात करून सत्प्रवृत्तीचा विजय घडवून आणणे शक्य असते. याचे उदाहरण श्रीकृष्ण आहे. तसे या बाबीचे दुसरे उत्तर युधिष्ठिर आहे, हीही एक बाब डोळ्यांसमोर ठेवता येईल. पण त्यासाठी अनंतरावांनी युधिष्ठिरावर लिहिले पाहिजे. कर्णावर लोक लिहितात. त्याला उत्तरे देत बसण्याइतकेच धडपणे कोणी यधिष्ठिर समजावून सांगत नाही. तो समजावून सांगणे ही सांस्कृतिक अभ्यासाची एक गरज आहे. अनंतरावानी है काम करावं अशी अपेक्षा आहे. माझ्यासारखा माणस युधिष्ठिरावर लिहिणारच नाही असे नाही. पण ते आम्ही लिहिले तर ऐतिहासिक अभ्यासाचा भाग राहील. अनंतरावांनी लिहिले तर सांस्कृतिक अभ्यासाचा भाग राहील.
 अनंतराव साठी ओलांडून पुढे जात आहेत. त्यांच्यासमोर त्यांचे काही संकल्प