पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/308

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठा घातक होता.
 हा निर्णय म्हणजे कारगिलमधील भारतीय जवानांच्या हाती .३०३ रायफल देऊन त्यांना स्वयंचलित मशिनगनसज्ज शत्रूला सामोरे पाठविण्यासारखे आहे, अशी टिप्पणी मी त्या वेळी केली होती.
 या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण सरकारतर्फे स्पष्ट सांगण्यात आले, की अजून काही वर्षेतरी जैविक वाणाचा प्रयोग करू देण्याचा सरकारचा इरादा नाही.
 नवीन चाचणीप्रयोगांची अंमलबजावणी, पुन्हा एकदा सरकारी दिरंगाईमुळे, फक्त दक्षिणेकडील राज्यातच होणार आहे. थोडक्यात, आणखी काही वर्षे हिंदुस्थानी कापूसउत्पादक शेतकरी जगामध्ये चमत्कार घडवून आणणाऱ्या क्रांतीचा मासलादेखील पाहू शकणार नाही अशी स्थिती झाली.
 एवढ्यात, गुजराथचा चमत्कार झाला. अहमदाबाद येथील एका कंपनीने काही वर्षापूर्वीच जैविक वाणाचे बियाणे अनधिकृतरीत्या हिंदुस्थानात आणले होते; सरकारी परवानगी वगैरे घेण्याचा भानगडीत ते पडले नव्हते. गुजराथेतील शेतकऱ्यांना ते बियाणे विकायला या कंपनीने सुरुवात केली. यंदाच्या तिसऱ्या वर्षी बोंडअळीने बाकी साऱ्या बियाण्यांची पिके फस्त केल्याने हा प्रकार उघडकीस आला. गुजराथमधील शेतकरी यंदाच्या अनुभवाने शहाणा होऊन जैविक वाणाखेरीज दुसरे कोणतेच वाण वापरण्यास तयार होणार नाही असे बोलू लागल्यावर अजैविक वाणांच्या उत्पादकांनी जोर केला. सर्व संबंधितांना जाबजवाबासाठी दिल्लीला बोलविण्यात आले. गांधीनगर जिल्ह्यातील दहेगाम तालुक्यातील सहा शेतकऱ्यांना त्यांनी पिके नष्ट करून टाकावी, असे फर्मान सोडण्यात आले. त्यानंतर, गुजराथ सरकारनेच लक्षात आणून दिले, की या वाणाची लागवड गांधीनगर जिल्ह्यापुरतीच नसून गुजराथभर सुमारे दहा हजार एकरांवर झाली आहे.

 आणि येथे सरकारी आतंकवाद जागा झाला. जेथे जेथे कापसाचे निरोगी पीक बहरताना दिसेल तेथेतेथे जाऊन रोपे उखडून जाळून टाकण्याचा आदेश पोलिस दलांना देण्यात आला आहे.
 खरे म्हटले तर, यात कापूसउत्पादक शेतकऱ्यांचा काहीही दोष नाही. शेतातल्या पेरणीकरिता शेतकरी अनेक मार्गानी बियाणे मिळवितो; पुष्कळदा शेजाऱ्यापाजाऱ्याकडून उसने किंवा विकतही घेतो. यंदाच्या लागवडीचे बियाणे मुख्यतः गेल्या दोन वर्षात जैविक वाणाचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना

अन्वयार्थ – दोन / ३१०