हे पान प्रमाणित केलेले आहे.
सरकारी घातपाताचे अनेक नमुने पुढे येत आहेत. खेड्यापाड्यात इंटरनेट (Internet) पोहोचावा यासाठी चेन्नई येथील I. I. T. चे प्रा. झुनझुनवाला यांनी एक नवी तंत्रज्ञानप्रणाली विकसित केली आहे. त्या प्रणालीला अमेरिकेत मान्यता मिळाली आहे; इतरही आठ देशांत तिचे चाचणीप्रयोग चालू आहेत. पण, भारतातील संचार मंत्रालयमात्र झुनझुनवाला यांच्या बिनतारी प्रणालीला जागोजाग अडवून धरीत आहे.
अशी उदाहरणे अनेक आहेत. या साऱ्या सरकारी आतंकवादाचे बळी ग्रामीण जनता व शेतकरी समाजच आहे. हा शुद्ध योगायोगच असेल तर तेही अद्भूतच मानावे लागेल!
दि. २७/६/२००१
■ ■
अन्वयार्थ – दोन / २५०