पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/207

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



जित्याची खोड…


 हिले महायुद्ध संपलेय देशात परतलेल्या वैफल्यग्रस्त रशियन सैनिकांनी बंड केले. आपले पगार मिळावे यापलीकडे त्यांची काही फारशी मागणी नव्हती; पण त्यांच्या उठावाची परिणती झारशाही उखडून टाकण्यात झाली. बोल्शेविकांनी कामगार क्रांतीची घोषणा केली तेथपासून ते बर्लिनची भिंत कोसळेपर्यंत जगावर समाजवादी साम्यवादी विचारांचे प्रभुत्व होते.
 'फायद्याच्या बुद्धीतून व्यक्तीव्यक्तींनी केलेले निर्णय देशाच्या हिताचे असू शकत नाहीत. खुल्या व्यवस्थेत प्रगती होईल; पण ती फार काळ टिकू शकणार नाही. समाजाच्या सर्वंकष आणि टिकावू विकासासाठी सर्वंकष नियोजनच हवे. खासगी मालमत्ता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि देशातील प्रत्येक नागरिक सरकारी यंत्राणेचा पगारी किंवा रोजीचा नोकर राहील अशी ही मांडणी.
 आज थोडक्यात तिचा सारांश सांगायचा म्हटले तरी इतक्या पागल विचारांच्या पिशाच्च्यांनी साऱ्या जगाला ७० वर्षे पछाडले होते. यावर विश्वाससुध्दा बसत नाही. इतक्या तुटपुंज्या अर्थशास्त्राच्या पायावर एका सम्यक तत्त्वज्ञानाचा डोलारा उभारला गेला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात - प्रश्न स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा असो, शेतकऱ्यांचा असो, दलितांचा असो - मार्क्सप्रणीत सिद्धांताचेच अधिराज्य चालू झाले. बुद्धिमंतांत तर एक बलदंड माफिया तयार झाला. मार्क्सच्या सिद्धांतापलीकडे जो कोणी काही बोलेल किंवा काही मांडेल तो अशास्त्रीय खोटा, कामगारविरोधी, अमेरिकन साम्राज्यशाहीचा कुत्रा असल्या निवडक नामाभिधानांनी त्याची संभावना होऊ लागली.

 इतिहास आणि विज्ञान असल्या बाष्कळपणाला थोडीच दाद देणार आहेत? त्यांचा प्रवाह अव्याहतपणे चालूच राहिला. साम्यवाद्यांचा बौद्धिक अहंकार इतका बलदंड, की त्यांनी इतिहासच काय विज्ञानही वाकवायला सुरुवात

अन्वयार्थ - दोन / २०९