पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अद्वैत मताच्या पताका दिगन्त गाजवणाऱ्या शंकराचार्यांच्या स्मारकाची काही पर्वाच वाटत नसावी.
 यवतमाळच्या रावेरी गावी वनवासी सीता आली. लवकुशांना सीतामाईंनी तिथेच जन्म दिला. प्रसूतिश्रमाने कांत झालेल्या सीतामाईने गावकऱ्यांकडे पसाभर गव्हाची भीक मागितली, नकाराने व्याकूळ झालेल्या सीतामाईने गावकऱ्यांना शाप दिला. ही केरळातील केलाडीच्या कहाणीप्रमाणेच हृदय हेलावून टाकणारी महाराष्ट्रातील घटना.
 श्रीमत् शंकराचार्य संन्यासी, स्वधर्माची पताका दिगंत नेणारे. त्यांच्याही नावे कोठे, ना चिरा, ना पणती आणि अयोद्धेची सम्राज्ञी, ज्याच्या मागोमाग चौदा वर्षे रानोमाळ फिरली त्या पतीने काढून लावल्यावर निराश्रित झालेली भूमिकन्या सीता, तिच्याही आरतीची काही व्यवस्था नाही. विश्वास बसणार नाही इतकी धीरोदात्त भव्य कथानके जेथे घडली, ती स्थाने आजही ओसाडवाणी पडली आहेत आणि भलत्याच कोणा एका देवळाचा अट्टहास चालू आहे. देशातील तरुणांपुढे आदर्श म्हणून नाहीत अशी तक्रार करण्याचा कोणाला काय अधिकार आहे?

दि. २४/१/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / १६०