पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ग्रंथांचे कर्तृत्व. सारेच काही अद्भूत!
 गेल्या वर्षी नर्मदेच्या आंदोलनाकरीता गुजरातमध्ये होतो. नर्मदा मातेच्या स्तवनाचे काव्य शोधत होतो. एकदम हाती पडले, 'नमामि देवी नर्मदे' कोणाची ही काव्यप्रतिभा? गौडपाद स्वामींच्या परंपरेत अमृतानुभवासाठी श्री शंकराचार्यांचे वास्तव होते. नर्मदा हा त्यांचा मोठा भक्तीचा विषय.
 'दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे
 त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे…'

 ओळीओळीला नर्मदेच्या प्रवाहाच्या ध्वनिलहरींची आठवण यावी ही काव्यशक्ती कोणाची? तर, ती होती अद्वैतवाद आणि उपनिषदांच्या प्रसाराकरिता सर्वसंगपरित्याग केलेल्या एका बालब्रह्मचाऱ्याची.

'ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्रयम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते..
सृर्ष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते…

 धबधब्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहणारी, नंतरच्या काळात फक्त संत रामदास आणि स्वातंत्रयवीर सावरकर यांना साधलेली काव्यशक्ती सहाव्या शतकातल्या एका संन्याशाने दाखवली.
 मागील आठवड्यात केरळ राज्यातील एर्नाकुलमजवळील केलाडी गावी जाण्याचा योग आला. केरळात केवळ वेगळी अशी गावे नाहीतच. सगळी गावे जवळजवळ एकमेकांना लागूनच वसलेली. त्यामुळे केलाडी गाव नेमके सुरू कोठे झाले आणि संपले कोठे, सांगणे कठीण आहे. केलाडी हे शंकराचार्यांचे जन्मगाव. वडील लहानपणी मरून गेलेले. विधवा आईने शंकराचार्यांचा सांभाळ केलेला. विद्याभ्यास झाल्यानंतर ऐन सोळाव्या वयात बाळ शंकर संन्यास घ्यायला निघाला. नवसासायासाने झालेल्या एकुलता मुलग्यास संन्यासाची परवानगी विधवा आईने हृदयावर कोणती शिळा ठेवून द्यावी? गावाला खेटून पूर्णा नदी वाहते. आता तिचे नाव पेरीयार ठेवले गेले आहे. म्हातारी आई दररोज नदीपर्यंत कष्टाने चालत जाते हे शंकरला पाहवले नाही. त्याने तळवा (केल) जमिनीवर ठेवून घोटा (अडी) फिरवला आणि र्साया नदीचा प्रवाह गावाशेजारी आणून ठेवला, म्हणून गावाचे नाव केलाडी. त्याच नदीत मायलेकरे पोहायला गेली. कोणी म्हणतात, बाळ शंकराने आईशी 'लडीवाळ छळ' केले, शंकर एकाएकी ओरडू लागला, 'मगरीने पाय पकडला, मला ओढून नेत आहे, आता

अन्वयार्थ – दोन / १५८