पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






गाठ पडली ठका ठका


 लोकसभेचे हिवाळी अधिवेशन २८ नोव्हेंबर २००० रोजी सुरू झाले. सुरवातीच्या काही दिवसांचे कामकाज पाहता हे अधिवेशन म्हणजे जणू काही 'शेतकरी महोत्सव' आहे असे वाटावे!
 पक्षाध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा आनंद अजूनही चेहऱ्यावरून ओसंडून वाहणाऱ्या, विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोनिया गांधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची मागणी करीत स्थगत प्रस्ताव मांडून, या महोत्सवाची पहिली तोफ डागली. नंतर, विरोधी पक्षाने दोन दिवस असा गदारोळ उठवला की लोकसभेत अन्य कोणतेही कामकाज होणे अशक्य होऊन बसले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या चर्चेवर काहीही बंधन राहणार नाही असे सभापतींनी निःसंदिग्ध अभिवचन दिले असतानाही विरोधी सदस्यांनी लोकसभेत धुडगूस घालून आपला गुंडागर्दीचा 'कोटा' पुरा करून घेतला.
 आणि खरेच जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा, साहजिकच उघड झाले, की विरोधी पक्षाच्या आणि मायबाप सरकारच्याही सदस्यांना शेतकऱ्यांबद्दल काही देणेघेणे नव्हते. चर्चेत विरोधी पक्षांपैकी मुलायमसिंगाच्या समाजवादी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा राजकीय भुलभुलैया वापरून वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर येण्यासाठी सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाबरोबर चढाओढ केली. जेव्हा चर्चेला परवानगी देण्यात आली तेव्हा विरोधी बाके तयारीअभावी पेचात सापडली.

 विरोधी सदस्यांच्या भाषणात सरकारी बाकांकडून होणाऱ्या अडथळ्यांतही ना उत्साह होता, ना अंत:प्रेरणा; विरोधकांच्या हल्ल्याच्या योजनेला ते खासगीत मान्यताच देत होते. 'सरकार शेतकऱ्यांच्या हालाखीबद्दल बेदखल आहे. सरकारने बलाढ्य महासत्तांपुढे गुडघे टेकून राष्ट्रहिताचा बळी दिला आहे आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणाची काही तजवीज न करताच आयातीवरील संख्यात्मक निर्बंध रद्द

अन्वयार्थ – दोन / १२१