रक्ताचे नाते माणुसकीशी राहत नाही, स्वच्छ रस्त्यावरची ती केवळ घाण असते. या विषयीची सहसंवेदना लक्ष्मीकांत देशमुखांनी मुखर केली आहे.
'लाईफ' 'टाईम' 'फार्म्युन' कथेला घटितांचे कितीतरी संदर्भ आहेत. १९९९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला अटक झाली, ही कथा लिहून प्रकाशित झाल्यानंतर सांगलीच्या सचिन माळी, त्याची पत्नी शीतल साठे यांना सक्रीय नक्षलवादी म्हणून अटक झाली, अशा अनेक संदर्भाच्या उगाळा म्हणजे 'लाईफ टाईम फॉयूँन' कथा आहे. नामदेव, सिद्धार्थ, नेहा या प्रॉमिसिंग (होतकरू) तरुणांना ती अटक झालेल्या एम.पी.एस.सी. माजी अध्यक्षाच्या तोंडाला चिखल फासला म्हणून. अध्यक्षांनी पैसे घेऊन दोन भावंडांना डी. वाय. एस. पी. पद 'चक्क' दिले होते. (म्हणजे ऑलिपिक मध्ये ब्राँझ - कास्यपदक मिळविले म्हणून डेप्युटी कलेक्टर पद ‘पदक' रूपाने द्यावे असे!) या घटनेमुळे विरुद्ध झालेली, अशा पदांची ध्येयाकांक्षा बाळगून मेहनत घेणारी तरुणाई तोंडाला काळे (चिखल) फासण्याचे काम करते. त्यांना अटक होते. सूर्यवंशी नावाचे म.से.लो.आ.चे सदस्य त्यांची जामिनावर सुटका करतात; परंतु ही तरुणाई कधी-कधी आततायी वागते.
सिद्धार्थ व नेहा नक्षलवादी होण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करतात तर नामदेव 'देशाला प्रामाणिक अधिकारी नको असतील तर नको; मी खाजगी मंडळात मोठ्या पगारावर नोकरी करेन' हे जाहीर करतो. ध्येय बाळगणाऱ्यांत संयम असावा लागतो. कारण जे साध्य करायचे आहे ते साधन प्राप्त करायचे असेल तर अनेक प्रकारांची स्पर्धा असते, हे न कळण्याइतपत स्पर्धाशील मनोवृत्तीचा तरुण नसतो. स्पर्धा म्हणजे गुणांच्यावर मात करणे. चांगुलपणावर निष्ठा असणारे तरुण अधिकारी होता येत नाही म्हणून आत्मघात करून घेत नाही. आपल्या ध्यासाचा उपयोग ते अन्य ठिकाणी करतात. ही प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती वाया जाऊ नये म्हणून स्वहित धोक्यात घालून धडपडणारी सूर्यवंशीसारखी माणसे सदैव दक्ष असतात, आपल्या नियत वर्तनाबाहेर जाऊन वर्तन करणारे नंदितासारखे अधिकारी आहेत. असे असताना टोकाच्या निर्णयाप्रत जाणारी अपरिपक्व विचारांची तरुणाई दिसून येते. या कथेत विचार आणि योग्य कृती यातील संघर्ष पाहावयास मिळतो. कथेत नाट्य आहे आणि भावनाप्रधान कृतीने कथा शिगोशिग झाली आहे.
आपापल्या अस्मितेच्या शोधामधून, संरक्षणामधून नक्षलवादी जन्मास येतात; परंतु भूमिका तार्किक असली तरी तो मार्ग आणि अवलंबिलेली प्रणाली फार घातक असते, कसे ते 'लाईफ टाईम फायूँन' कथेत फारच सहजसुंदरतेने प्रकट झाले आहे.
भारतीय संस्कृती निवृत्ती आणि प्रवृत्तीच्या संघर्षात अजूनही अडकलेली आहे. आणि हा संघर्ष आहे म्हणून प्रतिकूल जगणे होत आहे. याचे फार स्वाभाविक प्रत्यंतर
पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/43
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४ अन्वयार्थ
