पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजकारण किती हिडीस असते याची कल्पना सर्वसामान्यांना या कथेतून येते. परंतु किसनला हळूहळू पाटीलकीची नशा चढते. गावातील फुटकळ दारू पिऊ लागतो. सारजा त्याची पत्नी - या गोष्टीला नंतर कंटाळते. प्रामाणिक जगण्याला महत्त्व देते. रोजगार हमी योजनेवर प्रशिक्षणावरील कलेक्टर अधिकारी बाई सारजाच्या विचाराने प्रभावित होते. आपल्या असाईनमेंटस्साठी ती 'रोजगार हमी कामाचा स्त्री जीवनावरील परिणाम' हा विषय ती सारजाच्या आधारेच करते, हे सारे होऊन, अधिकारी मागास समाजाच्या पाठीमागे उभे राहूनही, समाजसुधारणा होत नाही याचे कारण समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला नाही.

।।६।।

 माणसं जिवंत ठेवणाऱ्या खेळाडूंमधील सामान्य माणूसपण दाखविणाऱ्या लेखकानं स्त्रीभ्रूणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊन 'सेव्ह द बेबी गर्ल' म्हणत आपल्या प्रतिभेचा अमिट ठसा उमटविलेला आहे. सुरुवातीला पाहिले आहे की, देशमुख हे प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यांनी आपल्या सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा उपयोग आपल्या प्रशासकीय कार्यात करून घेतला. परंतु ते सर्जन, नवनिर्माण असे वाङ्मय आहे. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' ह्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत पुष्पा भावे म्हणतात की, 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्ताऐवज असणाऱ्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे वाचक आभार मानतील. देशमुखांनी समाजाला उपकृत करून ठेवले आहे.
 'मुली वाचवा' असा उपक्रम सरकाराला हाती. घ्यावा लागला. मुळातच मुलगा वंशाचा दिवा असा समज कोणत्या शास्त्रीय सत्यांतून निर्माण झाला हे पाहणे समाजशास्त्रीचे काम आहे. पण या संबंधीचे समाजाची मानसशास्त्रीय चिकित्सा करून म्हणता येईल, की तो स्वार्थी आहे. म्हातारपणी आपली देखभाल करणारे, आपला सांभाळ करणारे आपल्या हक्काचे कुणी असले पाहिजे. ते आपलेच रक्त संबंधी असतील तर ते काम जबाबदारीने होईल - या स्वार्थी कल्पनेला वंशाचा दिवा ह्या समजाची जोड देण्यात आली. आणि तेव्हापासून जेंडर बायस सुरू झाले. मुलींचा दुस्वास करणे, दुर्लक्ष करणे, छळ करणे, तिच्या वाढीला वान न देणे या गोष्टी पूर्वी होत. तिच्या विकासाला तर संधी दिली गेली नाही. स्त्रीच्या विकासाच्या संधीचे प्रमाण अत्यल्प होते. अशा लोकविचारात शास्त्रीय शोध लागून गर्भलिंग - तपासणी यंत्र रासवट वृत्तीच्या डॉक्टरांच्या हाती आले. वंशदिवा अपेक्षितांचाही हा तिसऱ्या डोळाच ठरला.
  कितीतरी सहस्र लेकी आईबापांनीच मारून टाकल्या. ही प्रवृत्ती किती क्रूर आणि

अन्वयार्थ । ४१