पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/361

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. मुख्य म्हणजे मला माझ्या प्रशासकीय अनुभवावर आधारित कादंबरी त्रयी केव्हा तरी लिहायची आहे. साहिर लुधियान्वी व श्याम बेनेगलवर पुस्तक लिहिण्यासाठी अभ्यास चालू आहे. पुन्हा 'इन्किलाब' सारखी काश्मिर प्रश्नावरची एक बृहद् कादंबरी मला खुणावते आहे. शिवाय तीन कथा-संग्रह निघतील एवढ्या कथा विविध दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या आहेत, त्यांचे संकल्न करून ती पुस्तकेही यथावकाश येतील. आणखी एक विषय मला आकिर्षत करत आहे तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरनजिक वळीवडे येथे पोलंडचे दहा हजार निर्वासित स्त्री-पुरुष आले होते. त्यांच्या जीवनसंघर्षावर मला कादंबरी लिहायची आहे.
परसावळे -
 धन्यवाद देशमुखर्जी. तुम्ही फार स्पष्टपणे विनासंकोच व मनमोकळी उत्तरे दिली व आपल्या साहित्य विषयक कल्पना नेमकेपणानं मांडल्या त्या वाचकांना आवडतील, तसेच समीक्षक व विचारवंतांना विचार करायला भाग पाडतील असं मला वाटतं.
देशमुख -
 मी आपला अत्यंत आभारी आहे.

३६२ □ अन्वयार्थ