पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'प्रेमचंद' परंपरेचा पाईक

भ. मा. परसावळे


भ.मा.परसावळे -
 सर्वप्रथम नांदेड येथे भरणाऱ्या ३६ व्या मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! हा आपल्या आजवरच्या २० पुस्तकांच्या रूपाने केलेल्या साहित्य सेवेचा उचित गौरव आहे असे मी मानतो.
लक्ष्मीकांत देशमुख -
 आभारी आहे. मला ज्या असंख्य वाचक व साहित्यिक मित्रांचे फोन व एस. एम. एस. येत आहेत, त्यामुळे मी भारावून तर गेलो आहे, पण त्यापेक्षा अधिक विनम्र झालो आहे.
परसावळे -
 आता मुलाखतीकडे वळू या. माझा पहिला प्रश्न. हा जरी जुना असला तरी महत्त्वाचा आहे तो विचारतो. आपल्या लेखनाच्या प्रेरणा कोणत्या?
देशमुख -
 प्रत्येक माणसाला व्यक्त होण्याची सहज प्रेरणा असते, तशीच मन मोकळं करण्यासाठी ती गरजही असते. पण ज्यांना प्रतिभेचे वरदान मिळाले असेल, असे कलावंत नाटक - सिनेमा असेल वा नृत्य, संगीत अशा विविध कला माध्यमातून अभिव्यक्त होत असतात. मी शब्दात व्यक्त होणार नाही अशा अलौकिक प्रतिभेचा थोडा स्पर्श झालेला छोटा कलावंत आहे व कथा-कादंबरी हे माझे अभिव्यक्तीचे माध्यम आहे.

 आत्माविष्कार ही कलावंताच्या कलेची पहिली व अखेरची प्रेरणा असते, पण कलावंत हा समाजाचा जबाबदार घटक असतो आणि आपल्या काळाचं 'प्रॉडक्ट' अपत्य असतो. त्यामुळे त्याची कलाप्रेरणा केवळ मनाचा अविष्कार नसते, तर

३४६ □ अन्वयार्थ