पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यंदाच्या जयपूर लिटरेचर फेस्टिवल मध्ये (२०१४ जानेवारी) 'ग्रीड फॉर ग्लोबलायझेशन इज किलिंग इंडियाज सोल' यावर एक फार उद्बोधक चर्चा झाली होती, तिची आठवण मला आज तुम्हांला उत्तर देताना व माझं प्रकट चिंतन अभिव्यक्त करताना होतेय. स्वामी अग्निवेश यांनी बोलताना फार मार्मिक टिपणी केली होती. ती (संदर्भ पाहात) मी सांगतो. ते असं म्हणाले होते, ते मी मूळ इंग्रजीतच देतो.
 'It is theocratisation of the market place which is distrubing me. By glorifying globalisation we are glorifying greed. Anew God is emerging from the market forces and there is no place any more for social and economic justice.'
 काहींना हे विधान व प्रतिक्रिया टोकाची वाटण्याचा संभव आहे. पण आज भारतात ते घडताना दिसतंय. काही भांडवलदार अर्थविकास हा नवा देव मानू लागले आहेत. आपण 'गरज' (नीड) आणि स्वार्थ आणि ओरडबडून घेणं (ग्रीड) यामधला फरक विसरत चाललो आहोत. त्यामुळे भारतात जागतिकीकरणाची काळी बाजू मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ती अनेक देशांनी रोखली आहे, पण भारताचं खुजं व कमी बौद्धिक प्रतीचे नेतृत्व रोखू शकत नाही, हाच याचा मथितार्थ आहे. आज उजव्या पक्षाचं राज्य आहे व त्यांच्यासाठी स्वामी विवेकानंद हे ऑयडॉल आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध १८९३ च्या जागतिक धर्मपरिषदेमध्ये याबाबत सर्व जगाला इशारा देताना जे म्हटले होते, ते लक्षात ठेवावं असं मी सुचवेन. स्वामीजी असं म्हणाले होते,
 'Shall India die? Then from the world all spirituality will be extinct, all ideality will be extinct and in its place will reign the duality of lust and luxury as the male and female dieties, with money as priest. Fraud, force and competition its ceremonies and human soul as its sacrifice. Such thing can never be.....

 असं काही होऊ नये म्हणून लेखक म्हणून माझी व सर्वांचीच काही एक जबाबदारी नाही का? आम्हां लेखकांच्या लेखनातून ही चिंता, हा हास आणि हे बदल प्रतिबिंबित होणार की नाही? माझ्यापुरतं बोलायचं झालं तर 'अंधेरनगरी'मध्ये 'लस्ट फॉर पॉवर अॅण्ड मनी' - म्हणजेच सत्ता व पैशाची लालसा व राजकारणाचे गुन्हेगारीकरण रेखाटले आहे. 'ऑक्टोपस' मध्ये मी 'ग्रीड' ही 'नीड' वर कशी मात करते व भ्रष्टाचार कसा पसरतो व त्यात मानवी मूल्ये कशी हतबल होतात यावर कलात्मक भाष्य केलं आहे. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये दहशतवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद आणि सत्तेची लालसा व समाजावर नियंत्रण मिळवणे, स्त्रीला अधिक

३३८ □ अन्वयार्थ