पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दहशतवाद व कट्टरवादाचं समर्थन करणारं आकर्षक तत्त्वज्ञान बनवलं जातं. खरं तर हा वर्ग - अमिनची सौरक्रांती व १५-१६ वर्षांची डावी-पुरोगामी राजवट अनेक अर्थानी लोककल्याणकारी होती. मग अफगाणींना ती स्वीकारावी असं का वाटलं नाही? त्यातलं आंतरराष्ट्रीय कटकारस्थान व फूस सोडून द्या, पण दृश्य परिणाम म्हणून शिक्षण, जमीन सुधारणा व स्त्री स्वातंत्र्याची तेथे नवी पहाट झाली होती, ती आपल्या प्रगतीची आहे हे का त्यांना पटत नव्हतं? केमाल पाशा, राजा अमानुल्ला किंवा सद्दाम हुसेन हे सारे पुरोगामी राजकर्ते त्या त्या इस्लामी देशात आधुनिक जीवन पद्धती का स्थिरावू शकले नाहीत? असं काय तत्त्वज्ञान व विचारधारा इस्लाममध्ये आहे जी त्यांना आधुनिक लोकशाहीवादी व विज्ञाननिष्ठ बनण्यात अडथळा आणते? या साऱ्या प्रश्नांचा वेध मी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये घेतला आहे; पण तरीही समाधानकारक उत्तर सापडत नाही. भारतातही हमीद दलवाई मुसलमानांना पचत नाहीत. शबाना आझमी ही पुरोगामी न समजता जामा मस्जिदचे इमाम तिला 'नाचने गानेवाली औरत' असं हिणवतात. बॅ. अंतुले, हुसेन दलवाई वा असगर अली इंजिनिअर हे सर्वमान्य मुस्लीम नेतृत्व होऊ का शकलं नाही? या साऱ्या प्रश्नांचा विचार करून, त्यांच्या धर्मपरंपरा व जीवनपद्धतीचा विचार करीत वस्तुनिष्ठ उत्तरं शोधली पाहिजेत असं मला वाटते.
प्रा. रूपाली शिंदे :
 “जिहादी' माणसांचं अंतरंग, त्यांच्या संघटनेमधील सत्तास्पर्धा, निराशा, आशा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादाची समस्या मांडताना हे चित्रण महत्त्वाचे का वाटले? दहशतवाद्यांचे पाय पण मातीचे आहेत हे दाखवणे लेखक म्हणून तुम्हास महत्त्वाचे का वाटले?
लक्ष्मीकांत देशमुख :

 जिहादी मानसिकता समजून घेणं हे जगासाठी महत्त्वाचं आहे, कारण दहशतवादापासून आज कोणतेही राष्ट्र मुक्त-अनटचड् राहिलेला नाही. भारत तर नाहीच नाही. पुन्हा इथं त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंचा कट्टरपणा काही प्रमाणात वाढताना दिसतो. भगवा दहशतवाद ही अतिशयोक्ती म्हटली तरी तशी काही कृत्ये अलीकडच्या काळात झाली आहेत. पण ती भारतापुरती मर्यादित आहेत. इस्लामसारख्या मोनोलिथिक, एकेश्वरवादी व एक धर्मग्रंथांची सत्ता मानणाऱ्या धर्मात कट्टरता तुलनेने अधिक आहे. त्यामानाने जागतिक व इस्लामप्रमाणेच मोनोलिथीक धर्म असूनही आज ख्रिश्चनांमध्ये कट्टरता दिसत नाही. सारी ख्रिश्चन राष्ट्रे रेनेसान्स नंतर भांडवलशाही मार्गाने श्रीमंत होताना दिसतात. धर्म म्हणून बौद्ध, जैन कट्टरतावादाचा पुरस्कार करीत नाहीत व

अन्वयार्थ □ ३२९