पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रशासननामा व बखर


गूढ, गहन प्रशासन रूपी जंगलाचे चित्तवेधक दर्शन



लीना मेंहदळे


 प्रशासनात कल्पक, कृतिशील व आशावादी म्हणून ओळखले जाणारे श्री. लक्ष्मीकांत देशमुख नुकतेच त्यांची शासकीय कारकिर्द संपवून निवृत्त झाले. त्याच सुमारास त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला की त्यांच्या प्रशासनिक लेखनाबद्दल मी माझे मत व्यक्त करावे. तेही एका लेखाच्या स्वरूपाने.
 आधी हे प्रांजळपणे कबूल करायला हवे की त्यांचे इतर साहित्यिक लेखन मी वाचलेले नाही. मात्र "प्रशासनाची बखर' हे पुस्तक आधी वाचलेले होते. ते आणि "प्रशासननामा" अशी दोन पुस्तके त्यांनी लिहून काढली. ती वाचतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर, “अरे, मी पण अशी परिस्थिती अनुभवली आहे." प्रत्यय वारंवार येतो.

 प्रशासकीय अधिकारी दोन गोष्टी सहसा करत नाहीत, ज्या लक्ष्मीकांत देशमुखांनी या पुस्तकांच्या माध्यमातून केल्या आहेत. पहिली म्हणजे प्रशासकीय अनभुव लिहीत रहाणं! एरवी उत्तमोत्तम नोटिंग करणारे, नव्या स्कीम्सचे आराखडे मांडणारे, एन्कायरी रिपोर्ट लिहून पूर्ण करणारे, एव्हॅल्यूएशन रिपोर्ट लिहिणारे असे खूप अधिकारी पाहिले आहेत. ज्यांचे ते लेखन वाचल्यावाचल्या त्यांची विद्वत्ता व विषयावरील पकड लक्षात येते. लिहिण्याची हातोटी तर असतेच. तरी पण प्रशासकीय लेखन मात्र त्यांच्याकडून फारसे होत नाही. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने प्रशासन हे अजूनही एक गूढ, गहन जंगलच असते. आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या उदाहरणातून पटकन शिकता येत नाही. हा पायंडा बदलणारे अधिकारी अगदीच नाहीत असेही नाही, पण त्यांचे लिखाण इंग्रजीतून माधव गोडबोले, राम प्रधान यांच्या अनुभवांवर त्यांची गाजलेली पुस्तके इंग्रजीतूनच पुढे आली. देशमुखांची पुस्तके मात्र मराठीतूनच लिहिली गेली त्यामुळे त्यांचे वाचन अधिक अस्सल वाटते. पैकी 'प्रशासननामा'मध्ये छोट्या छोट्या प्रसंगातून फुलवलेली

अन्वयार्थ □ २७९