पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मशीद पाडल्यानंतर झालेल्या जातीय दंगली, तळागाळातील मुलामुलींची साधी भाषा. हिंदू व मुसलमान यांच्यातील विविध व्यक्ती रेखा काटेकोरपणे कथेत अवतरत राहतात. कधी जुन्या तरी कधी नवीन घटना - अशा प्रकारे वाचकाला गुंतवून ठेवत कादंबरी एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत राहते.
 ही कादंबरी वाचताना पाश्चात्त्य लेखिका 'डेबोरा एलीस' यांनी अफगाण निर्वासित मुलांवर लिहिलेल्या कादंबऱ्यांची आठवण येते. तसेच काही वर्षांपूर्वी 'मीरा नायर' यांनी काढलेला गाजलेला चित्रपट 'सलाम बाँबे'ची सुद्धा आठवण येते. या अव्वल कादंबरीत लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी बालकांच्या प्रश्नाला अत्यंत प्रखरतेने वाचा फोडलेली असून या कादंबरीचे मराठी नाट्यरूपांतरसुद्धा भेदक होऊ शकेल. तसेच या कादंबरीची गणना केवळ मराठीच नव्हे तर श्रेष्ठ दर्जाच्या भारतीय साहित्यात करावी लागेल असे मला वाटते. कादंबरीचा इंग्रजी व हिंदी अनुवाद करण्याचा विचार लेखक व प्रकाशकांनी करावा अशी नम्र सूचना आहे. या विषयावर इतकी सखोल विश्लेषण करणारी व तरीही खिळवून टाकणारी ही कदाचित पहिलीच मराठी कादंबरी असावी.
 कादंबरी लिहीत असताना लेखक देशमुख यांच्यातील कवी आपसूक जागा झालेला दिसतो. सरपंच लोखंडे यांच्या तोंडी आलेली ही बालमजुरीबाबतची कविता अत्यंत बोलकी आहे.

"तरटाच्या पडद्याआडून
एक बारा-तेरा वर्षांचा चेहरा डोकावला
तो चेहरा
 वसंतातल्या पहिल्या फुलासारखा ताजा होता
आणि डोळे
पहिल्या प्रेमासारखे निर्मळ
 पण त्याच्या हातावर

 भाज्या कापत राहिल्याच्या चिरा होत्या, आणि त्या चिरांमध्ये भांडी घासण्याची . राख जमलेली होती, त्याचे हात त्याच्या चेहऱ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते."

२६४ □ अन्वयार्थ