पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेतील सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांची असते; जिल्हाधिकारी हा जिल्हा स्तरावरील सर्वात प्रमुख अधिकारी असतो. या यंत्रणेतले सर्वच जिल्हाधिकारी सरसकटपणे वाईट असतात, भ्रष्ट असतात असे लेखक दाखवत नाही. याही व्यवस्थेत मनीषसारखे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी असतात आणि ते कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षही असतात. पण असे अधिकारी हितसंबंधांच्या आड येत असल्याने त्यांना मोठीच किंमत द्यावी लागते, मनस्ताप सहन करावा लागतो. या उलट, याच यंत्रणेत काम करणारे पांडेसारखे उच्चपदस्थ अधिकारी अंगालाही लागणार नाही, त्रास होणार नाही अशा सोयीस्करपणे आणि ब्युरोक्रॅटिक मानसिकतेने प्रशासन करीत असतात, देशमुखांनी बालमजुरी प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात नोकरशाहीच्या या दोन प्रवृत्ती मनीष आणि पांडेच्या कार्यपद्धतीच्या रूपाने दाखवल्या आहेत अधिकारपदाकडे बघण्याचे दृष्टिकोनही दोन प्रकारचे असतात. एक - मिळालेल्या पदाचा उपयोग निष्ठेने, निर्भयपणे आणि कर्तव्यबुद्धीने अपेक्षित कार्यासाठी करणे. जिल्हाधिकारी मनीष या दृष्टिकोनाचा अंगीकार करणारा आणि म्हणून Value conscious (मूल्यभान असलेला) आहे आणि दोन - मनीषची पत्नी मीनल अशा उच्चपदाकडे व्यावहारिक दृष्टीने पाहणारी, मूल्यांपेक्षा व्यवहार, यश, महत्त्वाकांक्षा यांना महत्त्व देणारी; त्यासाठी तडजोडी करायला हव्यात, संबंधित माणसांशी जवळीक ठेवायला हवी असे मानणारी आणि म्हणून करीअर कॉन्शस आहे. या दोन भूमिकांमुळे निर्माण होणारा तणाव मनीष आणि मीनलच्या स्वभावातून व्यक्त होत राहतो. 'आदर्शवादाचा जमाना संपला. बी पॅक्टिकल' असे मीनल मनीषला वारंवार सांगता असते आणि मनीष मूल्यासाठी किंमत द्यायला तयार असतो. मनीषला अरुण करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल मन:पूर्वक आस्था आहे. त्या कामाचे महत्त्व त्याने जाणले आहे, बालमजुरीच्या विरोधात शासनाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे, त्याला आपल्या कर्तव्यच्या आड येणारे, मग ते कोणीही असोत, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास तो कचरत नाही. त्याची किंमत त्याला मोजावी लागते. मनीषची बदली होते. त्याच्या जागी आलेले सिद्धार्थ पांडे विचाराने आणि कृतीने अगदीच वेगळी आणि सोयीस्कर भूमिका घेणारे. जोवर देशात गरिबी आहे, पुरेशा शाळा नाहीत, तोवर बाल कामगार राहणारच हे त्यांचे ठाम मत आहे, त्यामुळे बालमजुरीबद्दल ते गंभीर नाहीत. एवढेच नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांकरवी सव्र्हे केल्याचे नाटक करून ते आपल्या जिल्ह्यांत फक्त अकरा बालकामगार आहेत असे पत्रकार परिषदेत जाहीर करतात. शासकीय यंत्रणेत एखादा अधिकारी काही चांगले काम करीत असेल किंवा असे काम करण्याला साहाय्य करीत असेल, आणि त्याची

अन्वयार्थ □ २५७