पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काझीसाब, हे मला देशावर प्रेम करणारी एक इन्सान म्हणून मान्य नाही. म्हणून तुमच्या या तथाकथित इस्लामी कायदेकानूनचा मी सरेआम निषेध करते. ते बदलन आधुनिक नागरी कायदे आणावेत, अशी इल्तिजा करते. तरीही त्याचं पालन करून मी देहदंडाला मी देहदंडाला सामोरी जाणार आहे. लेकिन खुदा करे, मैं इस कानून तहत मरनेवाली आखरी इन्सान ठरूँ, फिर कमी किसीपर थे नौबत न आये...." (पृ. ४५७)
 जमिलाच्या आवाहनात संपूर्ण स्त्रीजातीचं दुःख लपले आहे. जमिलाच्या संपूर्ण विचारात समतोल विचार आढळतो. या कादंबरीला कोणताही एक नायक किंवा नायिका आहे असे दिसत नाही. पण अन्वर ही व्यक्तिरेखा मध्यवर्ती आहे. आणि मध्यवर्ती नसली तरी जमिला आपल्या समतोल आणि परखड विचाराने या कादंबरीत उठून दिसते आणि वाचकांच्या मनावर आपला ठसा उमटवते असे म्हणता येईल.
 सारांश, लक्ष्मीकांत देशमुख यांनी वास्तववादी चित्रण करणाऱ्या कादंबरीत आपल्या प्रतिभेने प्रचंड आवाका असलेल्या आशयाचा वाचकांच्या मनावर प्रत्ययकारी ठसा उमटवला आहे, असे म्हणता येईल.

अन्वयार्थ □ २३५