पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
धर्म विषयक चिंतन आणि चर्चा


 प्रस्तुत कादंबरीतील करीमुल्ला ही व्यक्तिरेखा महत्त्वाची आणि केंद्रवर्ती आहे. करीमुल्ला धर्मशास्त्राच्या चौकटीतच वावरणारे बुद्धिवादी नेते आहेत. त्यांना प्रगती हवी आहे ती इस्लामच्या चौकटीत. करीमुल्ला व अन्वर यांची धर्मविषयक आणि अफगाणिस्तानच्या विकासासंबंधी चर्चा होते. अन्वर हा त्या कादंबरीचा नायक, तो मार्क्सवादी विचारांचा पाईक आहे. या दोघांमधील चर्चा परंपरा आणि विकास यावर प्रकाश टाकते. 'खल्क' या साप्ताहिकातील नूर महमद तराकी यांच्या लेखावरून करीमुल्ला आणि अन्वर यांच्यामध्ये विचारमंथन होते. तराकीच्या लेखाचा सारांश असा की, "अफगाणिस्तान हा देश इस्लामपायी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला नकार देत आहे त्यामुळे तो मागास राहिला आहे. इस्लामच्या पलीकडे जगच नाही या भावनेवर तराकी हल्ला करतो. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याविना गरिबी आणि भूक नष्ट होणार नाही. धर्मपरंपरेच्या नावाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्याऐवजी मदरसा शिक्षणावर भर देणे योग्य नव्हे. युरोपनं विज्ञानयुगाची कास धरल्यामुळे त्याचा विकास झाला. पवित्र दिव्य 'कुराण' मधील मथितार्थ जाणून त्यानुसार आजच्या जमान्याशी सुसंगत गोष्टींसाठी पुढे येणं हाच आपल्या प्रगतीचा पाया ठरणार आहे. कमी बुद्धीच्या मौलवींच्या हट्टासाठी गरीब भुकेल्या व पशुवत जिणं जगणाऱ्या अवामसाठी आपण लढले पाहिजे.” या भूमिकेवर करीमुल्ला म्हणतात, “मी व्यक्तिश: कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याच्या संकोचाविरुद्ध आहे.... पण आता धर्मग्रंथावर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले, हा त्यांच्या लेखातील मुद्दा मला पटत नाही. आपल्या देशाची प्रगती मलाही जरूर हवी आहे, पण इस्लामियत सोडून नव्हे. मी सश्रद्ध मुस्लीम आहे व 'दीनेकामील' ची भूमिका म्हणजे आपल्या पवित्र धर्मग्रंथात बदल संभवत नाही, हा याचा पाया वा गाभा आहे. माझ्यावर 'अल अझर' मध्ये त्याचाच संस्कार झाला आहे. बहुसंख्य अवामची पण यावर श्रद्धा निष्ठा आहे. ते. धर्मग्रंथांच्या आधारेच प्रगती घडवून आणली पाहिजे. त्यासाठी शास्त्रार्थ दिला पाहिजे, तरच अवाम तिचा स्वीकार करील.”
  त्यावर 'आपण धर्मचिकित्सेला का घाबरतो' असा प्रश्न अन्वर त्यांना

अन्वयार्थ □ २२७