पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राध्यापकांना भाजी विकणं नशिबी आले आहे. कारण विद्यापीठं बंद पडली आहेत.... पाऊस नाही, दुष्काळ पडला आहे.... काही थोडे चैनीत गढले आहेत, इस्लामची तत्त्वं त्यांनी गुंडाळून ठेवली आहेत... युवा पिढी बरबाद झाली आहे. त्यातील एक प्रसंग अफगाणिस्तानचं कब्रस्तान कसं झालं आहे, हे दर्शवितो. कोवळी मुलं 'हड्डी ले लो नान दे दो' असं नान - चहाच्या दुकानापुढे घोळक्यानं जमून ओरडत आहेत. 'माझी हाडं आधी घ्या. माझा नंबर पहिला आहे' या प्रकाराचा अर्थ असा की, एक किलो हड्डींना दुकानदार एक नान देतो आहे. पूर्वी तो दोन द्यायचा. ही हाडांची काय भानगड आहे? शहरातून धान्य, फळं गायब आहेत. औषधं नाहीत. धट्टेकट्टे जिहादी लढ्यात कॅम्पमध्ये घरी जखमी; लाचार पुरुष आणि बायका. मग या मुलांची भूक कशी भागणार? आधी त्यांनी मारून खाल्लेल्या जनावरांची हाडं तेल, साबण नि कोंबडीच्या खाद्याच्या सौदागारांना दिली. ती संपली, तेव्हा या मुलांना त्या हाडांच्या व्यापाऱ्यांनी एक नवा मार्ग दाखविला. वीस वर्षात दहा हजार अफगाणी मारले गेले. सगळ्यांच्या नशिबी चांगली कबर कुठली? त्यामुळे कसं तरी पुरलेल्या खडड्यातून अद्याप माती न झालेली हाडं शोधून काढायची नि ती विकायची; त्या बदल्यात नान व पैसे मिळवायचे. एक आठ-दहा वर्षांची बालिका एक किलो हाडांना एकच नान मिळणार हे ऐकून विचारते, “या हिशोबानं मला तीनच नान मिळणार... घर में पाच आदमी है, कैसे भूक मिटेगी?" हे दृश्य फारच करुण आहे.

 अफगाणिस्तानच्या या भयानक अवस्थेला सगळेच जबाबदार आहेत. इस्लामी शिक्षा, छळ या जोडीला आले आहेत. जमीलाला फटके मारून आणि दगड फेकून जाहीरपणे मारलं जातं, जमीलाची व्यक्तिरेखा एका तेजस्वी स्त्रीची आहे. ती ज्या धैर्यानं शिक्षेला सामोरी जाते, तो प्रसंग काळजाचा थरकाप उडवितो.

तालिबानींचं भीषण चित्र

}
 तालिबान हा शुद्ध इस्लामी राजवटीचा प्रयोग कसा होता, याचं भीषण चित्र या कादंबरीत आहे. तालिबाननं दिलेल्या हुकमाप्रमाणे प्रत्येक अफगाण पुरुषानं दाढी राखली की नाही, पाच वेळा नमाज तो पढतो की नाही.... कबुतरं पाळणं, पतंग उडविणं हे इस्लामला निषिद्ध असणारे शौक कोण करतोय, हे पाहण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करतात. दाढी नसलेला पुरुष दिसला की, त्याला ती वाढेपर्यंत जेलमध्ये टाकणं, फटके मारणं, चोऱ्यांबद्दल हात-पाय तोडणं या शिक्षा. स्त्रियांनी तर एकटं बाहेर जायचंही नाही. बरोबर कुणी मर्द हवा. जाण्याचं कारणही योग्य हवं. शिक्षण बंद, नोकरी बंद. गोषा पायघोळ हवा. त्यातून पाय दिसले की पायावर फटके. असे किती तरी फतवे तालिबानी राजवटीने काढले. स्त्रियांनाही या गुलामीची

२०८ □ अन्वयार्थ