पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



धर्म आहे. 'इस्लामनं केवळ माणसाच्या पारलौकिक व आध्यात्मिक जाणिवेचा, भुकेचा विचार केला नाही, तर इहलोकाच्या व माणसाच्या सर्व अंगांनी व्यापलेल्या जीवनाचा विचार केला आहे. इस्लामी राजवटीचा आम्ही ध्येय म्हणून अंगीकार केला आहे. कारण त्यात माणसाच्या सर्वांगीण प्रगतीला वाव आहे. तो जसा अस्सल इहवादी, भौतिकतेचे महत्त्व जाणणारा व्यवहारी धर्म आहे, तसाच त्यानं संपूर्णपणे माणसाच्या आध्यात्मिक जाणिवेचा व त्याच्या कमतरतेचा विचार करून ते तत्त्वज्ञान आचरणासाठी दिलं आहे, ते अंगीकारलं तर राजकारण व सत्तेचा पाया शांती व माणुसकी हाच राहतो आहे. हे लक्षात येईल! आज आपली दीन - हीन अवस्था त्याचं योग्य आकलन न झाल्यामुळे आहे. म्हणून मी इस्लामी मूलतत्त्ववादी नाही तर इस्लामी पुनरुज्जीवनवादी आहे.' (पृष्ठ १२२ - १२३). प्रो. करीमुल्लांनी आपल्या या भूमिकेचा सतत पाठपुरावा केला. त्यासाठी व्यक्तिगत जीवनात त्यांना खूप मोठा मनस्तापही सहन करावा लागला. त्यांचा स्वत:चा मुलगा हाफिज हा त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. तो कम्युनिस्टांच्या बाजूने लढताना जिहादी हल्ल्यात मारला जातो. आपल्या विचार आणि तत्त्वांना विरोध करणाऱ्या मुलाच्या अंत्यविधीलाही हजर राहण्यास करीमुल्ला नकार देतात. इस्लाम धर्माला मान्य नसणारी आत्महत्येसारखी कृती करून मरणाला कवटाळण्याची आपल्या पत्नीची कृती करिमुल्लांना खूप व्यथित करते. आपल्या पत्नीने अधर्मवर्तन केले असे मानून ते तिच्याही दफनविधीला हजर राहात नाहीत. आपल्या तत्त्वांशी कट्टरपणे जागणाऱ्या करीमुल्लांना इस्लामी मुजाहिदीन मंडळीच्याही काही गोष्टी मान्य नाहीत.

 अफगाणिस्तानात अनेक सत्ताधारी मंडळींच्या भागिदारीत अफूचे शेतमळे फुलवितात व त्यातून मिळणारा अमाप पैशाचा वापर धर्मरक्षणासाठी करतात ही गोष्ट प्रो. करीमुल्लांना मान्य नाही. ते अनेक तहांनी अफू पिकविणाऱ्या मंडळींना समजविण्याचा प्रयत्न करतात. हजरतसाहेबांनी कोणत्याही मादक पदार्थ व पेयास निबिद्ध ठरवलं आहे. त्यांनी यासंबंधी दहा प्रकारच्या कामांशी संबंधित असणाऱ्या माणसांना शाप दिला आहे. मादक पदार्थ वा पेय प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तयार करणं, त्या क्रियेत भाग घेणं, त्याचा वापर करणं, खरेदी - विक्री करणं वगैरे क्रिया करणारी माणसं कुराणच्या दृष्टीनं गैरइस्लामी आहेत. (पृष्ठ ८७). प्रो. करीमुल्ला स्त्रियांच्या बुरखापद्धतीचा आग्रह धरतात तेव्हा त्याने प्रेरित होऊन काही जहाल मुस्लीम तरुण उघड्या पायांनी वावरणाऱ्या काही तरुणींवर तेजाब-अॅसिड फेकतात. मात्र या घटनेमुळे करीमुल्ला नाराज होतात. हतबुद्ध झालेले करीमुल्ला आपल्या सहकारी मित्रांजवळ आपलं मन मोकळं करताना म्हणतात ‘ऐसा बर्बर खूख्वार सलूक करके हमारे मुसलमानही इस्लाम को दाग लगाते है... इस्लाम म्हणजे शांती

१६४ □ अन्वयार्थ