पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शहराचा आपण विकास केला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या राजकारणातून पैसा कमावण्याची त्यांची इच्छा नाही. त्यांची राजकारणावर आणि प्रशासनावर कमांड पक्की असून त्यांच्याजवळ राजकीय धूर्तता आहे. ही संपूर्ण कादंबरी लालाजी आणि त्यांचे पक्षांतील विरोधक यांच्या संघर्षाची कहाणी असून नगरपालिकेतील नगरसेवकांचा एक गट सातत्याने त्यांना पदच्युत करून आपला माणूस त्या जागी आपण्याच्या प्रयत्नात आहे; कारण त्या गटाचे आर्थिक हितसंबंधांचे लालाजी संरक्षण करीत नाहीत. लालाजी यांच्या विरोधात मुसलमान नगरसेवकांचा . एक गट आहे. मराठा नगरसेवकांचा एक गट आहे. व काही मागास जातीतील नगरसेवकही आहेत; पण या गटाचे राजकारण व बनाव लालाजी आपल्या मुत्सद्देगिरीने उधळून लावतात.
 लालाजी स्वत: जरी भ्रष्ट नसले तरी सत्तेवर वर राहण्यासाठी त्यांना आपल्या गटातील नगरसेवकांचे हितसंबंध जोपासावे लागतात. त्यांच्या काही निर्णयामुळे त्यांचा स्वत:चा व विशेषत: त्यांच्या ज्येष्ठ भावाचा व्यावसायिक लाभ होतो. स्वातंत्र्य सैनिक आबा गुरुजींच्या जागेच्या बाबतीत त्यांची भूमिका अशीच संदेहास्पद होती. लालाजींना सत्तेवर राहण्यासाठी आणि आपले बहुमत टिकवून ठेवण्यासाठी आपल्या गटातील नगरसेवकांना खूश ठेवणे भाग होते व त्यासाठी त्यांना कामाची कंत्राटे देणे नगरपालिकेच्या ?? व जास्त व्यवहारात वाटा देणे व त्यांच्या हातात सतत काहीतरी मलिदा देणे भाग होते. आपण अशा प्रकारच्या भ्रष्टाचारास प्रोत्साहन देत आहोत याची त्यांना खंत होती; पण व्यवस्थेत टिकून राहावयाचे तर हे करणे भाग आहे हे त्यांना कळत होते व त्यांची ?? तीव्र होती. शहराच्या हद्दवाढी प्रकरणात खुद्द खासदारांचेच हितसंबंध धोक्यात आले. हद्दवाढीची मागणी लालाजींनी मान्य करून आणली. या संघर्षात लालाजींना अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय झाला. व त्यांनी राजीनामा द्यावा असे सांगण्यात आले; पण सुरुवातीस त्यांनी त्याची दखल घेतली नाही; पण आपल्याच जुन्या सहकाऱ्याच्या पाठीमागे बहुसंख्य नगरसेवक जात आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी राजीनामा दिला. पण राजीनामा दिल्यानंतर आपला दगा देणारा सहकारी प्रकाशभाई अध्यक्ष होऊ नये म्हणून त्यांनी हवे ते केले व त्याने विश्वासाने दिलेल्या कोऱ्या कागदाचा वापर करून त्यांचा राजीनामा लिहून मान्य केला. सत्तेच्या व सूडाच्या राजकारणात सत्प्रवृत्त भाणसाचा पण कसा नैतिक अध:पात होतो हे देशमुखांनी इथे दाखवले आहे.

 कादंबरीतील दुसऱ्या पातळीवरचा संघर्ष हा कर्तव्यदक्ष व स्वच्छ प्रशासनाचा ध्यास घेतलेला ध्येयवादी प्रशासकीय अधिकारी आणि नगरपालिकेतील भ्रष्ट प्रशासन यंत्रणा यांच्यातील आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन आलेल्या

१५० □ अन्वयार्थ