पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विशेषतः सत्तेच्या राजकारणाचे चित्रण करण्यात आले आहे. आज नगरपालिकेला नागरी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे; कारण नागरिकांच्या रोजच्या नागरी समस्या सोडवण्याचे काम नगरपालिका करते आणि नगरपालिकेचे हे काम जर प्रामाणिकपणे केले नाही तर नगरपालिका शहरास मोठ्या झोपडपट्टीचे रूप देऊ शकतात; कारण व्यापारी, उद्योजक, बिल्डर, व्यावसायिक ?? नगरसेवक नगरपालिका प्रशासनात अनेक वर्षे काम करताहेत. अधिकारी व पत्रकार या सर्वांचा नगरपालिकेच्या विविध निर्बधात वाव असतो. कारण प्रत्येकाचा त्यामागे काही एक स्वार्थ असतो व तो स्वार्थ बाधण्यासाठी धर्म, जात, मागासपणा व इतर अनेक बाबींचा नगरसेवक आणि राजकारणी उपयोग करून घेत असतात. स्वत: देशमुख हे प्रशासकीय अधिकारी होते. आणि प्रशासनातील निर्णय घेण्याची प्रक्रिया, त्यातील नगरपालिकांचे अधिकार व नगरपालिकांची काम करण्याची पद्धत व या सर्वांचे शहरातील राजकारण सत्तारूढ पक्षाचे व विरोधी पक्षाचे राजकारण आणि डाव्यांचे राजकारण यांच्याशी जवळचे संबंध असतात. या आपल्या माहितीचा चांगला उपयोग त्यांनी या कादंबरीत करून घेतला आहे. ही संपूर्णत: सगरपालिकेत चाललेल्या तीन वर्षांच्या सत्तेच्या राजकारणाचे चित्रण करणारी कादंबरी आहे. त्यात वर्णन केलेले स्थानिक नागरी राजकारणाचे चित्र अस्सल असून ते लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना अस्वस्थ करणारे आहे.
 या कादंबरीचे निवेदन मुख्यत: चार पातळीवर लेखकाने विकसित केले आहे. या चार पातळ्यांवर स्थायिक राजकारणात कसे संघर्ष निर्माण होतात व त्या पातळीवर त्या संघर्षाचे निराकरण कसे झाले याचे त्यात विवेचन केले आहे. या चार पातळ्या खालील प्रकारच्या आहेत
 १) शहराचे नगराध्यक्ष लालाजी व त्यांच्या विरोधात सातत्याने उभे राहिलेले सत्तेचे राजकारण. २) शहरात नव्यानेच आलेले ?? मुख्याधिकारी भांगे आणि नगराध्यक्ष लालाजी यांच्यातील संघर्ष. ३) मुख्याधिकारी भांगे आणि भ्रष्ट नगरसेवक आणि भ्रष्ट नगरप्रशासन यांच्यातील संघर्ष. ४) नगरपालिकेचे भ्रष्ट प्रशासन नगरसेवक - त्यांस पाठिंबा देणारे पक्षश्रेष्ठी, पत्रकार यांचा सामूहिक स्वार्थ आणि त्याविरूद्ध अत्यंत उदास वृत्तीने व पराभूत भावनेने संघर्ष करणारा नागरी समाज यांच्यातील संघर्ष. या चारही पातळ्यांवरचे संघर्ष वेगवेगळ्या व्यक्तींच्या मार्फत लढवले जातात व संघर्षाचे निरनिराळे आयाम देशमुखांनी या कादंबरीत हाताळले आहेत.

 लालाजी हे शहराचे नगराध्यक्ष. नांदेड शहरातील 'मोठ्या साहेबां'चे जे केंद्रीय नेते, आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ते गेली तीन वर्षे या शहराचे नगराध्यक्ष आहेत. ते सिंधी निर्वासित असून त्यांनी नेकीने व मेहनत करून पैसा कमावला आहे. ते स्वभावाने सत्प्रवृत्त असून ज्या शहराने आपल्याला मोठे केले त्या

अन्वयार्थ □ १४९