पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावविश्वच त्याला कारणीभूत आहे, हे लक्षात घ्यावे लागते.
 वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी त्यांच्या कादंबऱ्यांचा आशय पाहाणे उचित ठरेल. 'सलोमी' या लघुकादंबरीत मुस्लीम समाजात स्त्रीवर जो अन्याय होतो, त्याचे चित्रण आहे. सलोमी ही कॉलेजयुवती मुस्लीम समाजाचा सिनेमाबंद आदेश डावलून मैत्रिणींना सिनेमाला घेऊन जाते. त्यामुळे चिडून जाऊन तिचे वडील व्यसनी तरुणाशी लग्न लावतात. तो तिला सोडून देतो. पुन्हा घरी आल्यावर धाकट्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाल्यावर ती अरबाशी दुसरा निकाह लावून स्वत:ला समस्येच्या गर्तेत घेऊन जाते. 'सलोमी' मधीलच 'दिलीप' या दुसऱ्या लघु कादंबरीत अस्पृश्यांच्या छळाची मानसिक चित्रे येतात. उच्चशिक्षित असूनही दिलीप आणि त्याची मैत्रीण मारीया (निग्रो) वर्णभेदाची आणि जातिभेदाची शिकार होतात. 'अंधरेनगरी'मध्ये नगरपालिकेचे राजकारण चित्रित झाले आहे. पक्षांतर्गत राजकारणात पाटील, शफी हे कसे एकमेकांवर कुरघोड्या करतात आणि त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांना कसे वापरून घेतात, याचे चित्रण आहे. लालाणी आपली सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वच्छ प्रतिमेच्या मागे मुख्याधिकाऱ्यास अडचणीत आणून स्वत:ची पोळी भाजून घेतात. फायद्यासाठी सगळे पक्ष एकमेकांना कसे सांभाळून घेतात याचे मर्मभेदी चित्रण हा कादंबरी करते.
'इन्किकलाब विरुद्ध जिहाद' ही कांदबरी अफगाणच्या रक्तरंजित इतिहासावर आधारित आहे. रशिया आणि अमेरिका यांच्या शीतयुद्धाच्या काळात अफगाणसारख्या । देशाची कशी फरफट होते याचे चित्रण करणारी ही कादंबरी मुस्लिमांच्या अंतर्गत प्रश्नांनाही भिडते. अन्वर, तराकी, अमीन, गुल, प्रा. करीमुल्ला, डॉ. अनाहिता, जमीला, सलमा आदी पात्रांच्या माध्यमातून तालिबान, अल कायदासारख्या संघटना कशा जन्माला आल्या, त्यांना कसा विरोध झाला, मुस्लिमांची मूळची कट्टर धर्मांधता, मार्क्सवाद, पाश्चात्त्य भांडवलशाही, अफगाणचे दारिद्र्य, मागासलेपण या साऱ्यांमुळे अफगाण, पाकिस्तानसारखी राष्ट्रेच केवळ अडचणीत आलीत असे नाही; तर संपूर्ण जगच दहशतवादाच्या छायेत कसे वावरत आहे, याचा प्रत्यय ही कादंबरी देते. 'ऑक्टोपस'ही कादंबरी जिल्हाधिकारी आनंद पाटील आणि भगवान काकडे (तलाठी) यांच्या जीवनकहाणीतून महसुलातल्या भ्रष्टाचाराचे चित्रण करते. प्रशासनव्यवस्था भ्रष्टाचाराने कशी पोखरली आहे; आणि त्यामुळे आनंदसारख्या प्रामाणिक जिल्हा दंडाधिकाऱ्यालाही कशा तडजोडी कराव्या लागतात याचे तपशील ही कादंबरी देते.
 'हरवलेले बालपण' ही कादंबरी अरुण पालिमकर आणि कलेक्टर मनीष दवेच्या माध्यमातून बालमजुरीवर प्रकाश टाकते. बालमजुरीची प्रथा बालपणच

. .

१४२ □ अन्वयार्थ