पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या मनातला क्षोभ धुमसतच राहतो.
योजना होतात, पण ....
 खेड्यात योजना होतात, पैसा खर्च होतो; पण त्यांचा अपेक्षित फायदा मात्र गावकऱ्यांना होत नाही.
 इराची वाडी येथील विहिरीतील पाणी पिऊन गावातल्या प्रत्येक घरातला कोणी ना कोणी नारू होऊन आजारी पडलेला असे. जगदीश हा नव्याने आयएएस झालेला त्या गावाला भेट देऊन विहिरीची पाहणी करतो. केरवाडीतून पाणी आणता यावे म्हणून त्या दोन गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करतो. घरोघर स्वच्छ पाणी नळाने येऊ लागते. आपण एका गावाची समस्या समर्थपणे सोडवली, या आनंदात जगदीश असतो.
 पंधरा वर्षांनी त्याच भागात कलेक्टर म्हणून तो येतो आणि इराची वाडीचा सरपंच त्याला भेटण्यासाठी चिठ्ठी पाठवतो. त्याच्या पूर्वस्मृती जाग्या होतात. इराची वाडीमधील लोकांना अजूनही त्या विहिरीचे पाणीच प्यावे लागते, असे तो सरपंच सांगतो. तेव्हा जगदीशला आश्चर्य वाटते.
 केरगावच्या पश्चिमेकडील विहिरीतून या दोन्ही गावच्या नळ योजनेला पाणीपुरवठा होत असतो. दुष्काळात विहिरीचे पाणीही कमी झाले. केरवाडीलाही ते पुरेना, तेव्हा केरवाडीच्या सरपंचाने विहिरीपासून इराची वाडीला जाणारी पाईपलाइन तोडून टाकली. पाईप गायब केले. त्या पाटलाने कलेक्टरना मग जो सवाल केला, तो त्यांना निरुत्तर करणारा होता.
 'बांधा' मध्ये नवऱ्याकडून उपेक्षा होऊ लागलेल्या स्त्रीचे आपल्या कष्टांनी स्वावलंबी होण्याचे एक समर्पक तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले जाते.
 दुष्काळात गाईगुरांची दैना होते. पाणी नाही, चारा नाही. शेतकरी मग मातीमोलाने ते विकतात. कत्तलखान्यात त्यांना मारून, मांस विकून भरपूर पैसा मिळवतात. अलनूर एक्सपोर्ट कंपनी बीफ व फ्रोझन फूड अरबस्तानात पाठवते. गुरांसाठी उत्तम छावण्या चालवून दुष्काळात गाईगुरांना कत्तलखान्यात पाठवण्याची शेतकऱ्यांवर वेळ येऊ नये, अशी व्यवस्था सेवाभावी संस्थेतर्फे भिडेगुरुजी करतात. त्यामळे या कंपनीचा धंदा बसतो आणि मग एका आजारी बैलाच्या बातमीचा बाऊ करून त्या छावण्यांवर टीका केली जाते. गाईगुरे कसायांच्या हाती जातात, असा किस्सा 'दास्ताँ - ए - अलनूर कंपनी' मध्ये वाचायला मिळतो.
 संपन्न कृष्णाकाठची सुनंदा माणदेशच्या दुष्काळी भागात विवाहानंतर पदार्पण करते आणि पावसाची सर येते. सुनेच्या पायगुणाची तारीफ होते. तिच्याच प्रयत्नाने

अन्वयार्थ ११३