पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाण्यावाचून दाही दिशा - सुन्न करणारा अनुभव
शंकर सारडा

 'उदक' ('पाणी! पाणी!' या नावाने दुसरी आवृत्ती) हा श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचा चौदा कथांचा संग्रह. उपजिल्हाधिकारी म्हणून शासनाचा विपुल अनुभव त्यांच्या गाठीशी जमा आहे. त्या अनुभवांची सामग्री त्यांच्या लेखनाला वेगवेगळे विषय पुरवते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या आशयद्रव्याची विश्वासार्हता वाढवते.
  'उदक' या नव्या पुस्तकातील बहुतेक कथांमध्येही शासनातील वेगवेगळ्या खात्यांमधील आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमधील भिन्नतेची अनेकानेक उदाहरणे दिसतात. शासनयंत्रणेचे काम कसे चालते, मनात आणले तर एखाद्या कामात कोणीही कसे कोलदांडे घालू शकते, मूळ धोरणाचे धिंडवडे काढण्यात काही अधिकारी आपली बुद्धी व तर्कशक्ती कशी वापरतात, सरकारी कागदपत्रं कशी हवी तशी रंगवली जातात, सत्याला असत्य आणि असत्याला सत्य ठरविण्याची किमया त्यांना कशी साध्य असते, भ्रष्टाचार हाच शासनयंत्रणेचा परवलीचा शब्द म्हणून कसा काम करतो- याबद्दलचे या कथांमधून येणारे तपशील हे या कथांना एक सामाजिक व नैतिक परिमाण देऊन त्यांची आवाहकता वाढतात.
 या संग्रहातील बहुतेक कथा या दुष्काळी भागातल्या पाण्याच्या समस्येशी निगडित आहेत. या दृष्टीने 'उदक' हे संग्रहाचे शीर्षकही अर्थपूर्ण आहे. 'भूकबळी', 'खडकातील पाणी' या दोन कथा खास उल्लेख कराव्यात अशा आहेत. भूक वास्तवाचे वास्तव दर्शन घडवते, तर खडकात पाणी परिकथासदृश सज्जनांवर होणाऱ्या दैवी कृपेचे. हे पाणी 'उदक' या कथासंग्रहात वेगवेगळ्या रूपांत भेटते.
 उसाला दुसरी पाळी न देता आलेल्या जळलेल्या उसाच्या रूपात आणि त्यामुळे भग्न झालेल्या स्वावलंबी जीवनाच्या स्वप्नांच्या चुराड्यात.....
 नळपाणीपुरवठा योजनेची संबंधितांनी वाट लावल्यावर पायऱ्यांच्या विहिरीतले








११० अन्वयार्थ