पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुःखाच्या आणि भावनेने आपल्याला छिन्न भिन्न करते. भारत सरकारच्या, विशेष म्हणजे 'महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना दुष्काळ - शेती - पाणी - फलोद्यान - पर्यावरण - पाटबंधारे - लहान पाझर तलाव - शेततळी ह्यासाठी भक्कम निर्णय व पैसा उभा करून दिला पण ती कालबह्य व त्या त्या गरजांसाठी नीट उभी राहिलेली नाही. खूप दिलंय व शासकीय लालफितीच्या व क्रूरद्याच्या बंधनात अजूनहि; आहे म्हणून मरतांना पाणी द्यायचं - जिवंत असताना नाही असं योजनांचं चाललेले आहे. विकास आणि प्रगती कशी होऊ शकते. ते तुम्ही बदलवू शकता. रोजगार हमीच्या अतिशय चांगल्या निर्णयाचा गोंधळ झाला पण रेंगाळत व भ्रष्टाचारानं पार वेढलेल्या व्यवस्थेनं या योजनेचा बोजवारा उडविला. इथे रोज आशाळभूत नजरेनं उभा असलेला दीनदुबळा समाज त्याची कशी परवड झाली, होत आहे, चांगल्या योजनेचा बट्याबोळ करताना कोण कोण महाभाग त्याचे सारथी आहेत हे 'भूकबळी' सारख्या कथेतून वाचकांना अवस्थ करीत चीड आणतं. “पण आम्ही एवढे बथ्थड निळवलेले आहोत की आमचा कोणही बाल वाकडा करू शकत नाही." अशी यातली मुजोर व्यवस्था 'एक गाव एक पाणवठा' हे अत्यंत कळकळीनं असं सामाजिक ध्येयवादानं आयुष्यभर त्यात एकरूप असलेले समाज सेवक श्री. बाबा आढाव. या पुस्तकाला पस्तीसपेक्षा अधिक वर्षे झाली. त्यांची वाहवा करतात पण प्रत्यक्ष जातीजातीत फूट पाडून दलित यांना पाणवठ्यापासून तर सर्वच महत्त्वाच्या गोष्टींपासून सुदूर ठेवणारी ई. नीति म्हणजे 'कंडम' कथा. दुष्काळात पाण्याची विहीर ग्रहण करताना, संपूर्ण खेडं पाण्याविना मरताना आणि श्रीमंतांच्या विहिरीला कुठला न्याय? वरपर्यंत नाते-गोते संबंध, राजकीय संबंध व निवडणुकीच्या मतांसाठी लाचार असलेले पक्षापक्षाचे नेते राज्यकर्ते. त्यांना हात लावायचा नाही. मग उरतात ते सामान्य, विकल. त्याचं सत्यसुद्धा कोणी थोडंही ऐकायला तयार नाहीत. त्यातही धनसंपत्ती, राजकारण व श्रीमंताच्या मूर्ख मुलाच्या मनातील कामवासना. अगदी नग्न असं वास्तव. याला थोपविणं उलट त्याच्या दारी उष्टावळ्या वेचणारे आहेत. दुष्काळानिमित्त मोठ्या नेत्यानं, आमदार मंत्र्यांनी मुंबईच्या 'पत्रकारांचा दौरा मी वाचला. आपणही वाचा. मी तर हे विधान परिषदेत बारा वर्षे आमदार असताना अधिक जवळून महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. 'प्रवीण' सारखा पत्रकार, त्याची अस्वस्थता, मेंदूला सुन्न करणारे आघात मी अनेक जागरूक चांगल्या पत्रकारांचे, काही संपादकांचे पाहिलेले आहे. त्यांची चीड, वज्रमूठ लेखणी काही तरी नक्कीच बदलवू शकते ते कुठे बांधले गेलेत. त्यांच्या हाती बेड्या आहेत. ते झोकून देऊन कसं जगता येईल हा सामान्य गरीब पत्रकारितेचा प्रश्न आहे ते मी पाहिलेलं आहे. असं जखडबंड करणाऱ्या व्यवस्थेचं वर्तुळ एक-दुसऱ्यात गुंतलेला या कथांमधून लक्ष्मीकांत यांनी आत्मीय भावनेनं व घट्टलेखणीनं उभं केलेलं आहे. 'अलनूर' सारखी

अन्वयार्थ । १०७