पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन पध्दतीतील बदल

णताही उद्योग किंवा संस्था अखेरीस माणूसच चालवत असतो. पैसा, यंत्रसामुग्री, साधनं व मालमत्ता यांचं महत्त्व नाकारता येत नसलं तरी या निर्जीव वस्तूंवर माणसांचीच सत्ता चालते. त्यामुळे संस्था आणि उद्योगांचं व्यवस्थापन म्हणजे त्यातील 'माणूस' नावाच्या शक्तीचं व्यवस्थापन होय. पण माणूस हा स्वयंप्रज्ञ असल्याने त्याचं व्यवस्थापन यांत्रिक पध्दतीने व केवळ नियमांवर बोट ठेवून करणं यशदायी ठरत नाही. विशेषत: २१व्या शतकात या सत्याची जाणीव प्रकर्षाने होते.

 मानव व्यवस्थापन ही संकल्पना फारशी नवी नसली तरी गेल्या तीस वर्षांत तिला अनेक नवे आयाम प्राप्त झाले आहेत. मानवाचे व्यावसायीकीकरण जसं वाढू लागलं,

तसं मानव व्यवस्थापनाचं महत्त्व व या व्यवस्थापनांच्या पद्धतीत होणारे बदल स्वीकारणं हे अनिवार्य ठरत आहे.

 उदाहरणार्थ, ‘घर’ ही संस्था पाहा. घरातील मुलांना वाढविणं या संकल्पनेत गेल्या तीस वर्षांत किती बदल होत गेला आहे. मुलंं ही वयाने लहान असल्याने घरात त्यांचंं स्थान मोठ्या माणसांपेक्षा दुय्यम कित्येकदा नगण्य मानलंं जात असे. आज्ञाधारकपणा हा महत्त्वाचा गुण मानण्यात येई. घरातील घडामोडींबाबत मुलांनी मत व्यक्त करणंं किंवा त्यांचंं मत विचारणं कमीपणाचं वाटत असे.

व्यवस्थापन पध्दतीतील बदल/६२