पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग दुसरा)

गच्या लेखात आपण भारतीय उद्योग क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या महत़्त्व्याच्या चार आव्हानांचा आणि त्याच्या कारणांचा परामर्श घेतला. समस्या अनेक असल्या तरी त्यावर उपाय एकच असू शकतो, याचा बोध त्या लेखात दिलेल्या बिरबलाच्या गोष्टीवरून होतो. आपण गेली ५० वर्षे स्वीकारलेल्या नियंत्रित अर्थव्यवस्थेमध्ये आक्रमकतेपेक्षा सुरक्षिततेला जास्त प्राधान्य आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्रात घडणारे नवे बदल धडाडीने स्वीकारणंं अपलयाला शक्य होत नाही. नव्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे.अर्थव्यवस्थेचंं स्वरूप केवळ कागदोपत्री बदलून उपयोग होत नाही, तर हा बदल उद्योगधंद्यांच्या मालकांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांच्या मनात मुरावा लागतो. त्यानंतर तो कृतीत उतरतो आणि मग त्याचे चांगले परिणाम दृृष्टिपथात येत असतात.

 उद्योगाचे व्यवस्थापक हे मालक व ग्राहक यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत.त्यामुळेही बदलाची प्रक्रिया सुरू करून ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मुख्यत्वे व्यवस्थापकाची आहे. समस्या व आव्हाने अनेक असली तरी त्यावर कालमानाप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवून आणणं म्हणजेच उद्योगविषयक आपल्या संकल्पना परिस्थितीनुसार फिरवून घेणे आवश्यक आहे, हे मागच्या लेखातील बिरबलाच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात आलं आहेच. तोच धागा पकडून या आव्हानांचा स्वीकार आपल्या व्यवस्थापकांना

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ ४३