पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १.नवस्थापित संस्था २. वर्धिष्णू संस्था 3. परिवर्तनक्षम संस्था
 नवस्थापित म्हणजे नुकतीच स्थापन झालेली संस्था एखाद्या वस्तूचं उत्पादन व विक्री करीत असते. यासाठी पैशाची गुंतवणूक करून तंत्रज्ञान व यंत्रं खरेदी केली जातात. मात्र, ही खरेदी, त्यासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ, प्रशासन इत्यादी घटकांची जुळणी सुयोग्य पध्दतीनं न झाल्यास केवळ तंत्रज्ञान काहीच प्रभाव पाडू शकत नाही. हे सर्व घटक पुरविणाच्या व्यक्ती भिन्न भिन्न असतात. त्यांचा एकमेकांशी विसंवाद होण्याची शक्यता असते. त्यामुळं रचना, पध्दती आणि व्यावसायिक संबंध या सर्वांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशावेळी रचना व पध्दतीत सुसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापकीय सल्लागाराची मदत घेतली जाते.
 वर्धिष्णू किंवा विस्तार पावणाच्या संस्थांमध्ये उत्पादन व विक्री यांच्यामानानं संरचना, प्रशासन किंवा कार्यपध्दती हे घटक काहीसे मागं पडलेले दिसून येतात. त्यामुळं उत्पादन व विक्रीक्षमतेचा पुरेपूर लाभ उठवता येत नाही. यावेळीही त्यांची क्षमता सुधारण्यासाठी व्यवस्थापकीय मार्गदर्शकाची जरुरी लागते.
 या मार्गदर्शनाची सर्वाधिक गरज परिवर्तनक्षम म्हणजेच ज्या संस्थांमध्ये सतत बदल घडून येत आहेत, किंवा बदल घडण्याची शक्यता आहे, अशांना सर्वाधिक असते. उत्पादनाच्या मागणीत अचानक घट होणं, संस्थेचं अन्य संस्थेमध्ये विलीनीकरण होणं, संस्था 'आजारी’ होणं, बाजारपेठेची स्थिती बदलणं, वित्तीय अडचणी इत्यादीमुळं संस्थेच्या संरचनेत बदल होतो किंवा करावा लागतो. यावेळी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. मात्र, केवळ असमतोल संरचना किंवा कार्यपध्दती यामुळंच संस्थेवर विपरीत परिणाम होतो असं नाही. तर व्यावसायिक संबंधांमध्ये निर्माण झालेली समस्या हे अधोगतीचं महत्त्वाचं कारण असू शकतं.
 व्यावसायिक संबंधांमध्ये संस्थांतर्गत संबंध हे बहिर्गत संबंध यांचा समावेश आहे. संस्थेच्या विविध विभागांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांना अंतर्गत संबंध तर ग्राहक, पुरवठादार, कामगार संघटना, सरकार, समभागधारक इत्यादींशी असणाच्या संस्थेच्या संबंधांना बहिर्गत संबंध म्हणतात.

 संस्थेची संरचना, कार्यपध्दती व व्यावसायिक संबंध याबाबत निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी कशाचा उपयोग किती प्रमाणात व कोणत्या वेळी करावयाचा हे ठरविण्यासाठी समस्येचं व्यवस्थित आकलन होणं आवश्यक असतं. ते कसं केलं जात आणि मार्ग कसा शोधला जातो याविषयी पुढील लेखात माहिती घेऊ.

अद्भु्त दुनिया व्यवस्थापनाची/२२५