पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडं आपल्या अर्थव्ययस्थेने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे.
 नवं तंत्रज्ञान विकसित न करता आल्यानं काळाच्या पुढं राहण्याची शक्यता नाहीशी होते आणि सदैव आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागतं.
 ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी आणि परदेशस्थ तंत्रज्ञांना भारतात यावंस वाटावं याकरिता काही राज्यांमध्ये'तांत्रिक उद्यानं' स्थापन करण्यात आली आहेत.त्यांची संख्या व त्यातील सुविधा वाढाविणं आवश्यक आहे.त्यासाठी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून तांत्रिक व आर्थिक गुंतवणूक व्हावी असं धोरण आखणं आवश्यक आहे. सध्या त्या दिशेने पावले पडत आहेत.
भारताला असणाऱ्या संधी: उच्च तंत्रज्ञान अवगत असणं आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान ही बहुसंख्य सुशिक्षित भारतीयांची बलस्थानं आहेत.अमेरिका व युरोपमध्ये तंत्रज्ञांना जितका पगार द्यावा लागतो, त्यापेक्षा कमी पगारात्त्यांच्याइतकेच प्रवीण तंत्रज्ञ भारतात उपलब्ध होऊ शकतात.त्यामुळं उत्पादन खर्च कमी करण्यासाठीअनेक परदेशी कंपन्या भारतातून कामं करवून घेणं पसंत करतात. तंत्रज्ञान काम आणि नव्या तंत्रज्ञांची परिचय असा दुहेरी फायदा यामुळे होत आहे.विशेषतः या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या'आउटसोर्सिंग'चा लाभ मोठ्या प्रमाणात मिळत आहे.आता आफ्रिका व इतर मागास देशांची अर्थव्यवस्थाही स्थिरस्थावर होत असूनते भारताच्या संधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.त्या स्पर्धेला तोंड देण्याची तयारी आतापासूनच करावयास हवी.आपली उत्पादकता,किफायतशिरपणा, उत्पादने व सेवा यांची गुणवत्ता याकडे विशेष लक्ष देऊन भारत या स्पर्धेच्या यशस्वी मुकाबला करू शकतो.
भारताला असणारा धोका: भारताला सर्वात मोठा धोका चिनचा आहे.लष्करी नव्हे तर आर्थिक.चीनमध्ये एकापरीने हुकूमशाही राजवट असल्यानं वैचारिक मातभेदांना जागा नाही.त्यामुळे नवे बदल तो भारतापेक्षा अधिक झपाट्याने आत्मसात करू शकतो.पण हुकूमशाही राजवटीत अंतर्गत तणावांचं प्रमाण अधिक असतं. आणि त्याचा अतिरेक झाला तर देशांचे तुकडे होऊ शकतात. रशिया व युगोस्लाव्हिया यांची उदाहरणे ताजी आहेत.भारतात लोकशाही असल्यानं बदल स्वीकारण्याची गती धीमी आहे.सामाजिक ताणतणावांवर शांततेच्या मार्गाने मत करण्याची संधीही आहे.

तात्पर्य: आपण आपली शक्तीस्थानं अधिक बळकट करणं, कमजोरी नियंत्रणाखाली ठेवणं, संधीचा त्वरित लाभ उठवणं आणि धोक्याचा शिस्तबद्ध आक्रमकपणानं सामना करणं या चार मार्गांनी एकविसावं शतक भारताचं होऊ शकतं आणि ते तसं होण्याची क्षमता पल्याकडे निश्चितच आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१६५