पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
'युनान-मिस्त्र-रुमा सब मिट गये जहाँ से
अब तक मगर है बाकी, नामोनिशाँ हमारा’

 (ग्रीक ,इजिप्शियन आणि रोमन संस्कृती केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या.आम्ही मात्र काळाचं आव्हान पचवून टिकून आहोत.)असं इक्बालनं म्हटलं आहे.
 भारत व चीन यांना पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यांची मुळंं पक्की आहेत.काळाच्या खऱ्या कसोटीवर उतरलेली नीतिमूल्ये आणि सामाजिक संकल्पना त्यांच्यापाशी आहेत.याचा अप्रत्यक्ष उपयोग त्यांना नव्या जगात मानाचं स्थान पटकावताना होत आहे.
 तिसरं समान शक्तिस्थान म्हणजे नवं तंत्रज्ञान आपलंसं करण्याची क्षमता. विज्ञान व तंत्रज्ञान युगात दोन्ही देशांनी बराच उशिरा प्रवेश केला.पण ते त्वरित आत्मसात करणंं त्यांना अवघड गेलं नाही. अमेरिकेसारख्या देशात या दोन्ही देशांचे विशेषतः भारतीय तंत्रज्ञ नाव कमावून आहेत.तंत्रज्ञानाचे मेरुमणी समजले जाणारे अणुतंत्रज्ञान,अंतराळ तंत्रज्ञान आणि संगणक यात युरोप अमेरिकेच्या तोडीची कामगिरी भारत-चीनच्या तंत्रज्ञांनी बजावली आहे.
मर्यादा : लोकसंख्या हे जसंं शक्तिस्थान आहे, तशी ती कमजोरीही आहे.मोठ्या लोकसंख्येच्या अपेक्षा जेव्हा अर्थव्यवस्था पूर्ण करू शकत नाहीत,तेव्हा सामाजिक ताणताणाव निर्माण होतात. याचा अतिरेक झाला म्हणजे अराजक माजण्यासही वेळ लागत नाही.भारताच्या बाबतीत हि कमजोरी अधिक प्रकर्षाने जाणवते.कारण,आधीच लोकसंख्या जास्त, त्यातही ती शिस्तबध्द व समान विचारांची नाही. जात, समाज,भाषा,प्रांत इत्यादीवरून चालणारे वाद व त्यांचं पर्यवसान समाज दुभांगण्यात होणंं हे भारतात नेहमीचंंच आहे.यामुळंं समाज व व्यक्ती यांची नवनिर्मिती क्षमता, सृजनशीलता आणि रचनात्मकता नको त्या ठिकाणी खर्च होते.याचा तोटा अखेरीस सर्वांनाच भोगावा लागतो.
 आर्थिक प्रगतीला सामाजिक एकसंधता अत्यंत आवश्यक आहे.ती निर्माण केल्याशिवाय केवळ वैयक्तिक बुद्धीच्या जोरावर सर्वकष प्रगती साधणंं अशक्य झालं असतं.चीन यासंबंधी भारतापेक्षा अधिक सुदैवी आहे . आपल्यैतके भेदाभेद तिथं नाहीत.क्रिकेटच्या संघात केवळ अधिक संख्येनंं जागतिक दर्जाचे खेळाडू असून उपयोग नसतो,तर त्यांच्यात सांघिक भावना असणंं महत्वाचंं असतंं.ते वैयक्तिक विक्रामांचा विचार न करता, देशाच्या व संघाच्या हितासाठी खेळणारे असावे लागतात.तरच, संघ अधिक वेळा विजयी होतो. आर्थिक प्रगतीबाबतही हेच सत्य आहे.

 दोन्ही देशांची आणखी एक समान कमजोरी आहे. दोघांनीही तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे,पण नवं तंत्रज्ञान निर्माण करणंं त्यांना जमलं नाही. भारतीय तंत्रज्ञानी परदेशांत जाऊन नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती केली.पण स्वदेशात राहून ते करण्याची त्यांची तयार नाही. पैशाची हाव हे एकमेव कारण नाही.उच्च ज्ञान विकसित

एकविसाव शतक कोणाचं/१६४