पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकविसावं शतक कोणाचं?


द्योग व कारखानदारीचा विचार करता एकोणिसावंं शतक युरोपियनांचं होतं.या शतकात ब्रिटन,जर्मनी, फ्रान्स, हॉलंड इतकंच काय,तर बेल्जियम आणि इटली यांनी आर्थिक आणि लष्करी सत्तेच्या जोरावर आशिया आणि आफ्रिकेवर अधिराज्य गाजवलं. यामुळे या सर्व देशांची भरभराट झाली.

 विसाव्या शतकात त्यांची जागा अमेरिकेनंं घेतली.अमेरिकेची अर्थव्यवस्था युरोपियन देशांपेक्षा प्रबळ आणि गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ होती. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास तिथं अधिक झपाट्यानंं झाला. त्याचा उपयोग करून अमेरिका महासत्ता बनली.विसाव्या शतकाच्या अखेरीला तर‘जगातील एकमेव महासत्ता’ म्हणून ती ओळखली जाऊ लागली.आता नुकतंंच सुरू झालेलं एकविसावंं शतक कुणाचं असणार असं कुतूहलानं विचारलं जातंय. माझ्या मते ते आशिया आणि खास करून भारताचं होऊ शकतं. मागास समजल्या जाणाऱ्या आशियातील एक देश काय करू शकतो हे विसाव्या शतकाच्या अखेरच्या पंचवीस वर्षांंत जपाननं दाखवून दिलं आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया व काही प्रमाणात इंडोनेशियानंही त्याचंच अनुकरण केलं आहे.
 साप्रंंतच्या काळात जगाची नजर वळली आहे, ती भारत व चीनकङ. एकविसाव्या शतकातील महासत्ता म्हणून या दोन्ही देशांकडे पाहिलं जातंय.त्यांची शक्तिस्थानं,मर्यादा, संधी आणि धोका या चार मुद्यांवर जगात विचार केला जातोय. अमेरिकेसारखी महासत्ताही राजकीय मतभेद विसरून त्यांच्याशी सलोख्याचे आर्थिक संबंध ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहे.
शक्तिस्थानं :
 दोन्ही देशांचं समान शक्तिस्थान म्हणजे त्यांची लोकसंख्या.अतिलोकसंख्या हा शाप आहे असं समजलं जातं.तथापि, ही लोकसंख्या जर शिस्तबध्द असेल तर ती ताकदही बनू शकते. सध्या जगात लोकशाहीची लाट आली आहे.जनसंख्या हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.याचा फायदा हे देश घेऊ शकतात.

 टिकून राहण्याची क्षमता हे दोन्ही देशांचे आणखी एक समान शक्तिस्थान आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची / १६३