संकटाचे संधीत रुपांतर करी कला । ययि , गच्या लेखात आपण नोकरीवर टांगती तलवार असणा-या सुधीरची कथा पाहिली. सध्याच्या औद्योगिक मंदीच्या काळात त्याच्यासारखे व्यवस्थापकच नव्हे तर चतुर्थ श्रेणी कामगारांपर्यंत सर्वांवरच नोकरीच्या असुरक्षिततेचं संकट कोसळलं आहे. सरकारी तसंच खासगी उद्योगांची वाढ व विकास थंडावल्याने नव्या नोक-या निर्माण करणं तर सोडाच, पण असलेला कर्मचारी वर्ग राखणेही त्यांना कठीण होत आहे. | यावर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केल्या. त्यामुळे अनेक कर्मचारी ठराविक वय । गाठण्याअगोदरच निवृत्त झाले आहेत, किंवा होणार आहेत. म्हणजेच आज समाजात नोकरी (१६ । गमावण्याची वेळ आलेल्या, नोकरी प्रत्यक्षात गमावलेल्या व स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अशा तीन प्रकारच्या व्यक्ती 8 आहेत. पण त्यांच्यासमोर समस्या एकच आहे ती म्हणजे ‘पुढे काय करायचे?' या सर्वांना आर्थिक विवंचनेबरोबरच रिकामपणाची समस्या भेडसावू लागते. जीवन व्यर्थ चालले आहे, अशी भावना वाढीस लागून नैराश्य येते. मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परििस्थतीत जीवन अर्थपूर्ण बनविण्यासाठी खास प्रयत्नांची आवश्यकता आहे. अर्थपूर्ण जीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. १. कार्यमग्नता अदभुत दुनिया व्यवस्थापनाची / ३५ 4•••••
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/44
Appearance