Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवस्थापकीय शिक्षणाची प्रवास व्या वसायिक शिक्षणाची सुरुवात हजारो वर्षांपासूनच झाली आहे. अश्मयुगातील मानवाची उपजीविकेची साधनं केवळ शिकार आणि कंदमुळे व फळे गोळा करणं हीच होती. सुमारे १० हजार वर्षांपूर्वी त्यानं प्रथम शेती आणि पशुपालन ही दोन तंत्रज्ञानं आत्मसात केली. या तंत्रज्ञानामुळे मानवाचाच नव्हे तर इतर सजीवांचाही इतिहासच पालटून गेला. त्यांच्यामुळे मानवाची भटकंती संपून तो एका जागी स्थिर झाला. समृध्द आणि सुस्थापित झाला. त्याच्या गरजा वाढल्या. या वाढत्या गरजांमुळे अनेक नवनवे व्यवसाय व त्यांची तंत्रज्ञानं विकसित झाली. । सुरुवातीच्या काळात कोणत्याही व्यवसायाचे तंत्रज्ञान पित्याकडून मुलाला अशा प्तान संक्रमित होत असे. मुलगा नसेल तर जवळच्या नातेवाईकाला ते दिलं जात अस. आपला व्यवसाय आपल्या घराण्यातच राहावा अशी संकल्पना होती. त्यामुळे । घराण्याच्या पिढ्यान् पिढ्या एकच व्यवसाय करीत असत. घर त्या कुटुंबापुरतं एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रच असे. दोनशे वर्षापूर्वी प्रथम युरोपात उगम पावलेल्या आणि पुढील शंभर वर्षात जगभर पसरलेल्या औद्योगिक क्रांतीमळे माणसाला घरातून कारखान्यात नेलं. तंत्रज्ञानाचा विकास झाल्यानं अनेकविध नवे व्यवसाय जन्माला आले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात कारखानदारच आपल्या कर्मचारी वर्गाला प्रशिक्षित करीत असत. म्हणजेच प्रत्येक कारखाना हा प्रशिक्षण केंद्र बनला. आजही अनेक कारखाने तसंच संस्थांमधून अॅपॅटिस' पध्दती सुरू आहे. या क्रांतीमुळे कौटुंबिक रचनेतही आमूलाग्र बदल झाले. पूर्वी भटजीच्या मुलानं भटजी, वैद्याच्या मुलानं वैद्य, वाण्याच्या मुलानं वाणी, सुताराच्या मुलानं सुतारच हावंच अशी पध्दती होती. ती काळाच्या पडद्याआड जाऊन कोणत्याही कुटुंबातल्या मुलानं आणि मुलीनंसुध्दा आपली आवड, बुध्दी आणि शारीरिक क्षमता यानुसार कोणत्याही व्यवसायाचं शिक्षण घ्यावं अशी रीत सुरू झाली. । याचे तीन परिणाम झाले. एक, आपला कौटुंबिक व्यवसाय सोडून अनेकांनी नवे व्यवस्थापकीय शिणाचा प्रवास / २६७