मानव व्यवस्थापनाची केली एतनाम युध्दाची एक कथा सांगितली जाते. अमेरिकेने तिथे दारूगोळा 1 साठविण्यासाठी एक भांडार बनविलं होतं. अमेरिकन सैनिक त्याचं जिवापाड रक्षण करीत. त्या भांडाराभोवती काटेरी तारांची दोन कुंपणं होती आणि त्यांच्या मधल्या जागेत अमेरिकन सैनिकं आणि त्यांच्यासमवेत राखीव कुत्रे चोवीस तास पहारा देत. बाहेरून कित्येक वेळा व्हिएतनामी सैनिक त्यांच्यावर गोळीबार करीत. त्यात काही सनिक व कुत्री ठार होत असत. असे प्रकार नेहमी होऊ लागल्यावर श्वानपथकाच्या प्रमुखाने सैन्याधिका-याकडे अमेरिकेतून आणखी प्रशिक्षित राखण करणारी कुत्री आयात करण्याची मागणी केली. | सैन्याधिकारी म्हणाले, 'हे पाहा, या युध्दाला अमेरिकन जनतेचा विरोध आहे. आपण तेथून कुत्री आयात करीत आहोत आणि येथे त्यांना मारण्यासाठी सोडत आहोत, असे अमेरिकेतील प्राणी प्रेमींना समजलं तर ते आंदोलन करतील. युध्दाला होणारा वधि अधिक वाढेल. तेव्हा आहेत तितक्याच कुत्र्यांवर आपण काम भागवलं पाहिजे. एका श्वानपथकाची पाळी किती तासांची असते?' सहा तासांची', श्वानपथकाच्या प्रमुखानं सांगितलं. : . - मग ती आठ तासांची करा. म्हणजे आपल्याला राखणी कुत्र्यांचा तुटवड़ा पडणार. नाही,' सैन्याधिका-यांनी सल्ला दिला. | तसं होऊ शकत नाही सर. आपण माणसांना कुत्र्यांप्रमाणे राबवू शकतो, पण . थाना माणसांसारखं राबवू शकत नाही. सहा तास संपल्याक्षणीच ती आपल्या "आतीस्थानाकडे परततात. त्यापुढे एक क्षणही त्यांच्याकडून काम करून घेणं अशक्य असतं,' श्वानपथक प्रमुखानं सांगितलं. दुसरा एक प्रसंग सांगतो. एकदा मी हिमालयातील जीवसृष्टीसंबंधी एक चित्रपट पाहात होतो. हिमालयात प्रत्येक हजार फूट उंचीवर वनस्पती आणि प्राणी यांच्यात फरक पडलेला आढळतो, पण कोणत्याही उंचीवर समान असा एकच सजीव आहे, ती म्हणजे मानव हे तो चित्रपट पाहताना लक्षात येत होतं. । मानव आणि इतर प्राणी यांच्यात हाच फरक आहे. परिस्थितीच्या मागणीनुसार मानवव्यवस्थापनाची कला/२३९
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/244
Appearance