या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९ | २८ मे २००३ | शिवाजी पार्क, मुंबई येथे स्वतंत्र भारत पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू |
९० | ३० जानेवारी २००४ | स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी शेणगाव (अमरावती) ते कोराडी (नागपूर) पदयात्रा सुरू |
९१ | ७ जुलै २००४ | सहा वर्षांसाठीचे राज्यसभा सदस्यत्व सुरू |
९२ | ३१ डिसेंबर २००७ | रामेश्वरम येथे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे ह्या मागणीसाठी मेळावा. सर्व कर्जाचे कागदपत्र समुद्रात बुडवण्यात आले. |
९३ | २ जुलै २००८ | कोल्हापूर येथे इथेनॉल शिबीर सुरू |
९४ | ९ मार्च २०१० | सरकारने मांडलेल्या 'महिला आरक्षण विधेयका'तील आरक्षित जागा ठरवण्याची आवर्तनी सोडतीची तरतूद लोकशाहीला घातक आहे म्हणून राज्यसभेत एकट्याचे विरोधी मतदान (१८६ विरुद्ध १) |
९५ | २ ऑक्टोबर २०१० | रावेरी, जिल्हा यवतमाळ, येथील पुनर्निर्मित सीतामंदिराचा लोकार्पण समारंभ |
९६ | १० फेब्रुवारी २०११ | दिल्ली येथे 'अन्नसुरक्षा' या विषयावरील आंतराष्ट्रीय
परिसंवादासाठी गेले असताना हॉटेलच्या जिन्यावरून पडल्याने जखमी. हालचालींवर खूप मर्यादा. |
९७ | ३० जुलै २०१२ | बांदा, बुंदेलखंड, येथे किसान समन्वय समितीची
बैठक. जोशी उपस्थित असलेली शेवटची. |
९८ | ८ नोव्हेंबर २०१३ | चंद्रपूर येथे शेतकरी संघटनेचे बारावे अधिवेशन.
'पुन्हा एकदा उत्तम शेती' ही घोषणा. जोशी उपस्थित असलेले शेवटचे अधिवेशन. |
९९ | २५ नोव्हेंबर २०१४ | मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली. शेवटचा जाहीर कार्यक्रम. |
१०० | १२ डिसेंबर २०१५ | पुणे येथे निधन. |
५०२ ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा