पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९   २८ मे २००३ शिवाजी पार्क, मुंबई येथे स्वतंत्र भारत पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू
९० ३० जानेवारी २००४ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी शेणगाव (अमरावती) ते कोराडी (नागपूर) पदयात्रा सुरू
९१ ७ जुलै २००४ सहा वर्षांसाठीचे राज्यसभा सदस्यत्व सुरू
९२ ३१ डिसेंबर २००७ रामेश्वरम येथे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे ह्या मागणीसाठी मेळावा. सर्व कर्जाचे कागदपत्र समुद्रात बुडवण्यात आले.
९३ २ जुलै २००८ कोल्हापूर येथे इथेनॉल शिबीर सुरू
९४ ९ मार्च २०१० सरकारने मांडलेल्या 'महिला आरक्षण विधेयका'तील आरक्षित जागा ठरवण्याची आवर्तनी सोडतीची तरतूद लोकशाहीला घातक आहे म्हणून राज्यसभेत एकट्याचे विरोधी मतदान (१८६ विरुद्ध १)
९५ २ ऑक्टोबर २०१० रावेरी, जिल्हा यवतमाळ, येथील पुनर्निर्मित सीतामंदिराचा लोकार्पण समारंभ
९६ १० फेब्रुवारी २०११ दिल्ली येथे 'अन्नसुरक्षा' या विषयावरील आंतराष्ट्रीय

परिसंवादासाठी गेले असताना हॉटेलच्या जिन्यावरून पडल्याने जखमी. हालचालींवर खूप मर्यादा.

९७ ३० जुलै २०१२ बांदा, बुंदेलखंड, येथे किसान समन्वय समितीची

बैठक. जोशी उपस्थित असलेली शेवटची.

९८ ८ नोव्हेंबर २०१३ चंद्रपूर येथे शेतकरी संघटनेचे बारावे अधिवेशन.

'पुन्हा एकदा उत्तम शेती' ही घोषणा. जोशी उपस्थित असलेले शेवटचे अधिवेशन.

९९ २५ नोव्हेंबर २०१४ मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली. शेवटचा जाहीर कार्यक्रम.
१०० १२ डिसेंबर २०१५ पुणे येथे निधन.

५०२ ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा