हे पान प्रमाणित केलेले आहे.
| ७२ | १३ मार्च १९९५ | हिंगणघाट (वर्धा) व बिलोली (नांदेड) येथून विधानसभा निवडणुकीत पराभूत. |
| ७३ | ८ एप्रिल १९९५ | हैदराबाद येथे ॲन्जिओप्लास्टी |
| ७४ | १० डिसेंबर १९९५ | कापूस एकाधिकार खरेदीच्या विरोधात स्वातंत्र्य यात्रा. नरखेड येथे समारोप व तेथून मध्य प्रदेशातील पांढुर्णामार्गे कापूस सीमापार आंदोलन. |
| ७५ | १४ डिसेंबर १९९५ | औरंगाबाद येथे ऊस झोनबंदी विरोधात उपोषण सुरू. |
| ७६ | २७ एप्रिल १९९६ | नांदेड लोकसभा मतदार संघातून लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी. पराभूत. |
| ७७ | ४ एप्रिल १९९७ | पंजाब व हरियाणामधील गव्हाच्या भावाचे आंदोलन. |
| ७८ | ९ ऑगस्ट १९९७ | 'Q' आंदोलन सुरू. 'नोकरदार चले जाव', 'भ्रष्टाचार चले जाव' |
| ७९ | ५ जून १९९८ | इस्लामपूर (सांगली) येथे शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ग्रामीण साहित्य संमेलन |
| ८० | १० डिसेंबर १९९८ | स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अमरावती येथे जनसंसद सुरू |
| ८१ | २० डिसेंबर १९९८ | पुण्याहून दिल्लीला जाताना विमानातच अर्धांगवायूचा झटका. शरीराची डावी बाजू कमकुवत झाली. |
| ८२ | १२ मार्च १९९९ | शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून औद्योगिकीकरणासाठी 'भामा उद्योगनगरी'चे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन |
| ८३ | ५ एप्रिल १९९९ | मुंबईत बॉम्बे हॉस्पिटल येथे बायपास सर्जरी |
| ८४ | ४ डिसेंबर १९९९ | गुजरातमधील नर्मदा जन आंदोलन |
| ८५ | १० जानेवारी २००० | जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) महानिदेशक माईक मूर यांची दिल्ली येथे भेट शेतकऱ्यांवर लादलेल्या उणे सबसिडीची माहिती दिली |
| ८६ | १२ सप्टेंबर २००० | जोशींच्या अध्यक्षतेखाली अटल बिहारी वाजपेयी यांच्यातर्फे कृषी कार्य बल स्थापन |
| ८७ | ६ एप्रिल २००१ | नवी दिल्ली येथील नेहरू स्टेडियमवर 'किसान कुंभ' भरवून शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित |
| ८८ | १५ नोव्हेंबर २००२ | तीन महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेला सुरुवात |
अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ■ ५०१