या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८ | १६ जानेवारी १९८८ | सांगली येथे व्ही. पी. सिंग यांच्या उपस्थितीत मेळावा |
५९ | १८ एप्रिल १९८८ | जळगाव येथे शेतकऱ्यांचा राजा शिवाजी व दलितांचा कैवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा मेळावा. कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा. |
६० | १ मे १९८९ | दारू दुकान बंदी आंदोलन सुरू |
६१ | ३ जुलै १९८९ | महिला आघाडीचे जिल्हा परिषद कब्जा आंदोलन |
६२ | २ ऑक्टोबर १९८९ | बोट क्लब, नवी दिल्ली, येथे पाच लाखांचा किसान जवान मेळावा. महेंद्रसिंग टिकैत यांनी उधळून दिलेला. |
६३ | ८ नोव्हेंबर १९८९ | अमरावती येथे महिला आघाडीचे दुसरे अधिवेशन. शेतकरी महिलांच्या संपत्ती अधिकारासाठी 'मंगल सावकाराचे देणे फेडण्याचे आवाहन. जातीयवादी घटकांना गावबंदी करण्याचा निर्णय. |
६४ | ३१ डिसेंबर १९८९ | दिल्ली येथे किसान समन्वय समितीची बैठक, नवनिर्वाचित पंतप्रधान व्ही. पी. सिंग व उपपंतप्रधान देवी लाल उपस्थित. |
६५ | २ जानेवारी १९९० | महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधून 'अर्थवादी चळवळीला क्षुद्रवादाचा धोका' समजावून सांगण्यासाठी फुले आंबेडकर विचारयात्रा सुरू |
६६ | १४ मार्च १९९० | व्ही. पी. सिंग यांनी शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सल्लागार समिती स्थापन केली |
६७ | २ ऑक्टोबर १९९० | लक्ष्मी मुक्ती अभियान सुरू. जमिनीची मालकी शेतकरी महिलांच्याही नावे व्हावी ह्यासाठी. |
६८ | १० नोव्हेंबर १९९१ | शेगाव येथील शेतकरी मेळाव्यात चतुरंग शेतीची योजना. खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत. |
६९ | ३१ मार्च १९९३ | डंकेल प्रस्तावाच्या स्वागतासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचा 'आर्थिक मुक्ती मोर्चा' |
७० | २९ ऑक्टोबर १९९३ | औरंगाबाद अधिवेशनात डंकेल प्रस्तावाला जाहीर पाठिंबा व 'चतुरंग शेती'च्या अंमलबजावणीसाठी 'शिवार ॲग्रो प्रा. लि. कंपनीची घोषणा |
७१ | ६ नोव्हेंबर १९९४ | नागपूर येथे स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना |
५०० ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा