पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८  १६ जानेवारी १९८८ सांगली येथे व्ही. पी. सिंग यांच्या उपस्थितीत मेळावा
५९ १८ एप्रिल १९८८ जळगाव येथे शेतकऱ्यांचा राजा शिवाजी व दलितांचा कैवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा मेळावा. कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा.
६० १ मे १९८९ दारू दुकान बंदी आंदोलन सुरू
६१ ३ जुलै १९८९ महिला आघाडीचे जिल्हा परिषद कब्जा आंदोलन
६२ २ ऑक्टोबर १९८९ बोट क्लब, नवी दिल्ली, येथे पाच लाखांचा किसान जवान मेळावा. महेंद्रसिंग टिकैत यांनी उधळून दिलेला.
६३ ८ नोव्हेंबर १९८९ अमरावती येथे महिला आघाडीचे दुसरे अधिवेशन. शेतकरी महिलांच्या संपत्ती अधिकारासाठी 'मंगल सावकाराचे देणे फेडण्याचे आवाहन. जातीयवादी घटकांना गावबंदी करण्याचा निर्णय.
६४ ३१ डिसेंबर १९८९ दिल्ली येथे किसान समन्वय समितीची बैठक, नवनिर्वाचित पंतप्रधान व्ही. पी. सिंग व उपपंतप्रधान देवी लाल उपस्थित.
६५ २ जानेवारी १९९० महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधून 'अर्थवादी चळवळीला क्षुद्रवादाचा धोका' समजावून सांगण्यासाठी फुले आंबेडकर विचारयात्रा सुरू
६६ १४ मार्च १९९० व्ही. पी. सिंग यांनी शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सल्लागार समिती स्थापन केली
६७ २ ऑक्टोबर १९९० लक्ष्मी मुक्ती अभियान सुरू. जमिनीची मालकी शेतकरी महिलांच्याही नावे व्हावी ह्यासाठी.
६८ १० नोव्हेंबर १९९१ शेगाव येथील शेतकरी मेळाव्यात चतुरंग शेतीची योजना. खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत.
६९ ३१ मार्च १९९३ डंकेल प्रस्तावाच्या स्वागतासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचा 'आर्थिक मुक्ती मोर्चा'
७० २९ ऑक्टोबर १९९३ औरंगाबाद अधिवेशनात डंकेल प्रस्तावाला जाहीर पाठिंबा व 'चतुरंग शेती'च्या अंमलबजावणीसाठी 'शिवार ॲग्रो प्रा. लि. कंपनीची घोषणा
७१ ६ नोव्हेंबर १९९४ नागपूर येथे स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना

५०० ■ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा