पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ही जबाबदारी केंद्र शासनाने घेतली म्हणजे वर दिलेल्या सहमतीचे चार मुद्दे लक्षात ठेवून बांधकामाचा नकाशा तयार करणे हे स्थापत्यशास्त्रज्ञांचे काम होईल आणि ते खरे त्यांचेच काम आहे. स्थापत्यशास्त्रातील प्रश्न म्हणून अयोध्या वादाकडे पाहिले गेले असते तर वाद इतका चिघळलाच नसता आजपर्यंत हा वाद महसुली आहे, न्यायिक आहे, राजकीय आहे, धार्मिक आहे असा गहजब करून एक लहान जखम नासवण्यात आली. केंद्र शासनाने मुत्सद्देगिरी दाखवली, हिंमत दाखवली तर स्थापत्यशास्त्रज्ञ अजूनही काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशाची एक शलाका दाखवू शकतील.


(२१ जुलै १९९२)

♦♦

भारतासाठी । ५८