पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अयोध्या प्रश्न सोडवण्याची कुणाला इच्छा आहे का हो?



 योध्या पुन्हा पेटत आहे :

 अयोध्येत मंदिर-मशीद वाद पुन्हा एकदा कडेलोटाच्या अवस्थेत पोहोचला आहे. ३१ ऑक्टोबर १९९० रोजी अडवाणींच्या रथयात्रेच्या शेवटी हे प्रकरण गरमागरम झाले होते आणि त्याच्या आचेत विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार पायात वितळून कोलमडले. यावेळच्या उद्रेकात आजचे मध्यवर्ती शासन लगेच कासळेल अशी काही फारशी शक्यता नाही; पण केंद्र शासनाने उत्तर प्रदेशातील भा.ज.पा. चे शासन बरखास्त केले आणि त्या राज्यात पुढच्या निवडणुका राममंदिराच्या प्रश्नावरच झाल्या तर मंदिरवादी आजच्यापेक्षाही मोठ्या बहुसंख्येने निवडून येतील. एवढेच नव्हे तर मंदिर बांधणीच्या मार्गात व्यत्यय न आणणारे शासन दिल्लीत पाहिजे अशा मुद्द्यावर पुढील सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर केंद्रातही मंदिरवाद्यांची सत्ता येणे सहज संभाव्य आहे.

 जबाबदारी शासनाचीच :

 शिळा बनलेली अहिल्या प्रभुरामचंद्रांच्या स्पर्शाने उद्धरली आणि सजीव झाली तसेच राममंदिराच्या स्पर्शाने नापीक आणि निरर्थक जातीयवादी मंच तरारून वाढत आहेत. हा प्रश्न उठवल्याबद्दल विश्व हिंदू परिषद किंवा भारतीय जनता पार्टी यांना दोष देण्यात फारसा अर्थ नाही. सत्ता टिकावी म्हणून इंदिरा गांधी समाजवादाची, गरिबी हटविण्याची घोषणा करू शकतात तर भा. ज. पा.च्या मंडळींनी रामाविषयी देशभर असलेल्या प्रेमादर भावनेचा उपयोग का करू नये? अयोध्येचा प्रश्न चिघळला आणि त्याचा धोका राष्ट्रीय एकात्मतेलाच वाटू लागला याची जबाबदारी मंदिरवाद्यांकडे नसून वेगवेगळ्या शासनांनी याविषयी घेतलेली निष्क्रियतेची भूमिकाच या परिस्थितीस जबाबदार आहे. रामजन्मभूमीबाबरी मशीद प्रकरणाचा अलीकडचा इतिहास थोडक्यात असा आहे.

भारतासाठी । ५०