पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पर्यावरणासाठी नियोजन पाहिजे या लबाडीने ते शेतकरीविरोधी आणि नोकरशाहीस सुकर अशी व्यवस्था बळकट करू पहात आहेत. पन्नास वर्षांपूर्वी समाजवाद, नियोजन, शास्त्रविज्ञान यांच्या जल्लोशात शेतकऱ्याला गाडण्यात आले. आता पर्यावरणाचा नवीन जल्लोश त्याच हेतूने उठवण्यात येत आहे.

 नेहरूवादाची ही नवीन पिलावळ उठते आहे. कदाचित् दुसऱ्याही अशा पिलावळी उठतील. या सर्वांचा बंदोबस्त कायमचा करायचा तर 'नीरो'वाद अखेरचा आणि कायमचा गाडला पाहिजे."


(६ जुलै १९९२)

♦♦

भारतासाठी । ४९