पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/319

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती निवारी, न ही आवरी बेशरमी हैवान' अशी बिरुदावली देऊनच ठेवली आहे.

 एकेकाळच्या तेजस्वी भारतात हे षंढत्व कोढून आले? इतिहासाचार्य राजवाडे यांच्या शब्दात, 'अन्न सौलभ्य आणि अन्न सौकर्य' यांचा त्यात भाग किती? हे षंढत्व आणण्यात बौद्ध मताची भूमिका केवढी महत्त्वाची? अध्यात्मवादी संतपरंपरेने देशावर ही मरगळ आणली काय? भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा या घसरगुंडीत भाग केवढा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे विश्लेषण करून द्यावी लागतील. त्याहीपलीकडे जाऊन पुन्हा एकदा भारत 'पराजित' रहाण्यापेक्षा 'आक्रमक' झालेला जास्त चांगला असा आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी तेजस्वितेचा विचार या षंढ समाजात रूजू शकेल काय, रुजवायचा झाला तर तो कसा याचाही विचार आवश्यक आहे.

(२१ ऑगस्ट २००८)

◆◆

भारतासाठी । ३१९