पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/318

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बिहारी वाजपेयी यांच्या शासनालासुद्धा घेण्याची हिम्मत झाली नाही. भाजपाची मंडळी नेहमी उत्तुंग ध्येयवादाच्या गप्पा ठोकतात, पण ऐनवेळी त्यांनीही कच खाल्ली. त्याची किंमत त्यांना २००४च्या निवडणुकीत मोजावी लागली. खरे म्हटले तर, 'तेजस्वी भारत' ही घोषणा मोठी क्रांतीकारी होती. त्याचे इंग्रजी भाषांतर कोणा गळबटाने केले. 'खपवळर डहळपळपस' याचा अर्थ 'वरवर चमकणारा भारत' किंवा 'चकाकणारा भारत' असा होतो; 'तेजस्वी भारत' असा नाही. निवडणुकीच्या वेळी भारताला एकदम जागतिक महासत्ता बनवण्याचे आश्वासन लोकांना पटले नाही. कंदाहारच्या विमान अपहरणप्रकरणी भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने कच खाल्ली नसती आणि खुद्द सुरक्षामंत्र्यांनाच आतंकवाद्यांपुढे नाकदुऱ्या काढायला पाठवले नसते तर मतदारांना 'तेजस्वी भारत' ही घोषणा भावली असती. कथनी आणि करणी यातील हा फरक राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भोवला.

 खेळाचे मैदान असो का दैनंदिन नागरी जीवन असो, भारतीय समाजाला षंढपणाने ग्रासले आहे. त्यांचे नेतृत्वही पिवळ्यांच्या हाती गेले आहे हे ऐतिहासिक सत्य आहे. सर्व भारतखंड ही एक शापित भूमी आहे, ग्रीक परंपरेतील 'डेपीळपशपीं ष उळील' प्रमाणे या भूमीला जो जो स्पर्श करतो त्याचे वीरत्व संपते हा सिद्धांत एका प्रख्यात बंगाली विचारवंताने यापूर्वीच मांडला आहे. येथे आर्य आले, निस्तेज झाले. मुसलमानी आक्रमणाचा वेगही येथेच संथावला. साम्राज्यशाहीसुद्धा येथे नबळ झाली.

 'जनता वीर्यहीन आणि नेतृत्व पिवळे' या निष्कर्षात एक मोठा विचित्र भाग आहे. पराक्रमहीन लोक आपल्यापेक्षा कमजोर कोणी दिसला तर त्याच्यापुढे शौर्य गाजवण्यात धन्यता मानतात. भारतीय समाजाचे असेच आहे. शंभरेक माणसे विमानात नष्ट होतील म्हणून आतंकवद्यांपुढे शेपूट घालणारे, खुद्द भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला फाशी देण्यची हिम्मत न करणारे शासन पंधरा वर्षांत दीड लाखावर शेतकरी दारिद्र्यामुळे, कर्जबाजारीपणामुळे हताश होऊन आत्महत्या करतात तरी शेतकऱ्यांना जीव देण्यास भाग पाडणारीच धोरणे क्रूरपणे अमलात आणणारे सरकार इतक्या आत्महत्या झाल्यानंतरही अजून शेतीमालाचे भाव पाडण्याचेच कारस्थान पुढे चालवते. याचा अर्थ असा की, संयमाबद्दल गुजराथी जनतेची पाठ थोपटणारे डॉ. मनमोहन सिंग यांचा संयम सशक्तापुढे नमण्याचा आणि दुबळ्यांवर लाथा झाडण्याच्या मानसिकतेचा आहे. 'वरच्या लत्ता झेलित माथां, सवे झाडिती खाली लाथा' अशांना कवीने 'न

भारतासाठी । ३१८