पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/317

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर धरणी हादरायचीच' असे समर्थन केले त्यांच्याच पक्षाची मंडळी आता 'चिडू नका, रागवू नका, आहे ते सोसून घ्या' असा उपदेश करतात आणि हाच या देशातील सभ्याचार आहे, शिष्टाचार आहे असे स्वीकारून लोकही पुढच्या आतंकवादी घटनांची वाट पहात बसून रहातात; पण, निवडून गेलेल्या सरकारला आणि त्यातील जबाबदारी व्यक्तींना अशी भूमिका घेता येणार नाही. लोक शांत राहिले, त्यांनी नागरिकांचे कर्तव्य बजावले; पण, यानंतर जबाबदारी चालू होते ती शासनाची. दोषी लोकांना शोधून काढणे, त्यांना मदत, आसरा आणि शस्त्रपुरवठा करणारांनाही वेचून काढून, त्यांना प्रस्थापित कायद्याप्रमाणे तत्परतेने शिक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. षंढपणा अंगी बाणवणारा पक्षाघात सर्वसामान्य भारतीयांनाच झाला आहे असे नाही तर त्यांच्या शासनालाही झाला आहे.

 शासनकर्त्यांनी दयाळू असावे, कष्टाळू असावे अशा बुद्धीचे सम्राट अशोकाचे भूत भारतीय शासकांच्या डोक्यावर बसते. कोणाही पंतप्रधानाची आपल्या एका निर्णयामुळे कोणालाही धक्का पोहोचू नये, कोणाचाही जीव जाऊ नये अशी आत्यंतिक इच्छा असते. आतंकवाद्यांपुढे शरणागती पत्करल्यामुळे ते अधिक शेफारतात. आतंकवादाला सर्वंकष विरोध झाला पाहिजे ही गोष्ट नुसती बोलायची. राज्यकर्त्यांना जो कठोरपणा अपरिहार्यपणे दाखवावा लागतो तो दाखविण्याची हिम्मत असलेले राज्यकर्ते स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेच नाहीत.

 "गांधी आणि त्यांचे अनुयायी ही सारी काड्यामोड्याची माणसे आहेत, त्यांना देशावर शासन करणे जमणार नाही" ही चर्चिलची भविष्यवाणी खरी ठरली. कोणताही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली की ऐनवेळी कच खाणे याला इंग्रजीत 'पिवळेपणा' असा शब्द आहे. मराठीतला शब्दमात्र अर्वाच्य आहे. गांधींच्या स्वातंत्र्यआंदोलनातून तयार झालेले सर्व नेतृत्व पिवळे निघाले. गांधीजींनी भ्याडपणाला अहिंसेचा मुलामा कधी दिला नाही; पण, त्यांचे सारे शिष्य आपला भ्याडपणाच अहिंसा शब्दाच्या आड लपवून राहिले आहे.

 मुफ्ती सईद यांच्या मुलीचे आतंकवाद्यांनी अपहरण केले त्या वेळी मी विश्वनाथ प्रताप सिंगांच्या जवळ होतो. त्यांनी माझे मत विचारल्यानंतर मी स्पष्टपणे आतंकवाद्यांची मागणी फेटाळून लावण्याचा सल्ला दिला होता. विश्वनाथ प्रताप सिंग हा भारतातील सर्वाधिक लेचापेचा पंतप्रधान. त्यांना ते झेपले नाही. आतंकवाद्यांची भूक वाढली.

 कंदाहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळीसुद्धा जे व्हायचे असेल ते होऊ द्या, आम्ही आतंकवाद्यांच्या मागण्या मान्य करणार नाही अशी भूमिका अटल

भारतासाठी । ३१७