पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/316

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येऊ देणे ही काही फारशी चांगली गोष्ट नाही हे आता सर्वमान्य झाले आहे. आतंकवादी कोण आहेत, त्यांचे करविते कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. हे सारे कोठे रहातात, कोठे लपतात, स्फोटके कोठे जमवतात हेही सर्वांना माहीत आहे; पण, त्याबद्दल बोलणे सभ्यतेचे मानले जात नाही. पोलिसांच्या चौकशीत एखाद्या संशयितावर पोलिसांनी काही बळाचा वापर केला तर पोलिसांचा निषेध करण्याकरिता छऋज (गैरसरकारी स्वयंसेवी संस्थां) चे मोठे जाळे तयार झाले आहे. आतंकवाद्यांच्या कृत्यांना बळी पडलेल्या निरपराध नागरिकांकरिता आसवांची दोन टिपे गाळणारेसुद्धा दुर्मिळ. आतंकवाद्यांच्या मानवी हक्कांची जपणूक झाली पाहिजे, याबद्दल आग्रह धरणाऱ्या संस्था अनेक आहेत; पण, प्रस्थापित शासनाविरुद्ध हत्यार घेऊन उठणाऱ्या आतंकवाद्यांना जास्तीत जास्त युद्धकैदी म्हणूनच वागणूक दिली जाऊ शकते असे छातीठोकपणे म्हणण्याची कोणी हिम्मत करीत नाही. आतंकवाद्यांमार्फत त्यांचे करविते धनी भारतावर अप्रत्यक्ष युद्ध (इ) चालवीत आहेत असे अनेकांनी म्हटले, तर त्याचे तर्कशुद्ध उत्तर द्यायला कोणी धजावत नाही. भारतीयांतील तेजस्विता कोठे गेली? प्रतिकार न करता मार खाऊन घेऊन आत्मपीडनातच महात्मेपण मानण्याची ही प्रवृत्ती का बळावली? या पलीकडे जाऊन, आपला छळ करणाऱ्यासमोरच नाकदुऱ्या काढाव्या, त्याचेच कौतुक करावे हे का घडते आहे?

 ही लाचारीची मनोवृत्ती इतरत्र कोठे दिसत नाही असे नाही. विमानांच्या अपहरणातून सुखरूप वाचलेले प्रवासी अपहरणाच्या काळात अपहरणकर्त्यांनी त्यांना कसे धाकात ठेवले आणि प्रवाशांपैकी काहींना कसे मारुन टाकले याचाही विसर पडन. बाहेर आल्यावर आतंकवादी व्यक्तिशः किती भली माणसे होती ज्यांनी काही प्रतिकार केला नाही त्या सगळ्या प्रवाशांना त्यांनी किती चांगले वागवले याचे गुणगान गातात; पण, भारताच्या या साऱ्या राष्ट्राचे अपहरण कधी झाले, कसे झाले, अपहरणकर्ते कोण होते आणि साऱ्या देशाला पक्षाघात घडवणारा हा षंढपणा सर्व भारतीयांना कसा काय ग्रासू शकला?

 नागरिकांनी आतंकवाद्यांबद्दलची आपली चीड दाखवण्याकरता सूडबुद्धीने काही करू नये असे राज्यकर्ते बजावून सांगतात ते समजण्यासारखे आहे. राज्यकर्ते व पोलीस अधिकारी यांच्या मनात अशा घटनांच्या वेळी एकच विचार असतो - प्रथम सारे शांत शांत होऊ द्या, मग बाकीच्या साऱ्या गोष्टींचा विचार करता येईल. ज्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींच्या वधानंतर दिल्ली शहरभर शिखांचे शिरकाण घडवून आणले, एवढेच नव्हे तर त्यावर, 'एखादा मोठा वृक्ष कोसळला,

भारतासाठी । ३१६