पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/308

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरली. या काळात, नरसिंह राव यांनी ठरविले असते तर मशीद धराशायी होणे त्यांना नक्कीच टाळता आले असते; पण, अनेक क्षेत्रांत कार्यक्षमता दाखविणाऱ्या नरसिंह राव सरकारने, जाणता न जाणता, मशिदीवरील हल्ला होऊ दिला हे खरे.

 नव्या निवडणुका जवळ आल्यावर नरसिंह राव यांनी पहिल्यांदा स्वतःच्या नेतृत्वाची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला; पण, नेहरू-गांधी घराण्याच्या सावलीत त्याला फारसे यश आले नाही. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि पहिल्यांदा 'अब की बारी, अटल बिहारी' ही घोषणा समूर्त झाली.

(२१ सप्टेंबर २००६)

◆◆

भारतासाठी । ३०८